शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 01:45 IST

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ६०० रुग्णांचा शोध मंगळवारी घेण्यात आला. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ४९ हजार ४४० रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तीन हजार ९८३ मृतांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून उघड झाली.ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ३९६ रुग्ण नव्याने आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ७३९ झाली. उल्हासनगरला ३० रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात आतापर्यंत आठ हजार ३४९ बाधितांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्यामुळे २५५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३५ रुग्ण नव्याने सापडले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथ शहरात ६० रुग्ण आढळून आले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार ५८६ बाधित तर २०९ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ८१ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण पाच हजार १६७ झाले आहेत.नवी मुंबईत ४०५ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल २७१८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के झाले आहे. नवी मुंबईमध्ये मंगळवारी ३११ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३१३१६ झाली आहे. शहरात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६८ दिवसांवर पोहचले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरारमध्ये २६८ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात मंगळवारी नालासोपारा शहरात दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर बाधित रुग्णसंख्या २६८ ने वाढली. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात २०७ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७९९ वर पोहोचली असून वसई-विरार २० हजारच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.रायगडमध्ये ६४६ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी ६४६नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे. त्यामुळेबाधितांची संख्या ३८ हजार ४१९ वर पोचली आहे.दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०३७ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३० हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस