शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 01:45 IST

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ६०० रुग्णांचा शोध मंगळवारी घेण्यात आला. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ४९ हजार ४४० रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तीन हजार ९८३ मृतांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून उघड झाली.ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ३९६ रुग्ण नव्याने आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ७३९ झाली. उल्हासनगरला ३० रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात आतापर्यंत आठ हजार ३४९ बाधितांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्यामुळे २५५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३५ रुग्ण नव्याने सापडले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथ शहरात ६० रुग्ण आढळून आले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार ५८६ बाधित तर २०९ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ८१ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण पाच हजार १६७ झाले आहेत.नवी मुंबईत ४०५ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल २७१८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के झाले आहे. नवी मुंबईमध्ये मंगळवारी ३११ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३१३१६ झाली आहे. शहरात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६८ दिवसांवर पोहचले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरारमध्ये २६८ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात मंगळवारी नालासोपारा शहरात दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर बाधित रुग्णसंख्या २६८ ने वाढली. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात २०७ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७९९ वर पोहोचली असून वसई-विरार २० हजारच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.रायगडमध्ये ६४६ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी ६४६नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे. त्यामुळेबाधितांची संख्या ३८ हजार ४१९ वर पोचली आहे.दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०३७ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३० हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस