शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

शाळांची स्वच्छता खाजगी संस्थांकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:43 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३६ शाळांतील स्वच्छता व सुरक्षितता खाजगी संस्थांच्या हाती देण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या महासभेत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३६ शाळांतील स्वच्छता व सुरक्षितता खाजगी संस्थांच्या हाती देण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या महासभेत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. या संस्थांनी पालिका शाळांना वेळोवेळी आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षाही बाळगण्यात आली असून त्यामागे शाळांतील सुमार दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.शहरातील विविध ठिकाणच्या २२ इमारतींत पालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत चार हजार ५११, हिंदी माध्यमात दोन हजार ५९५, गुजराती माध्यमात ३४१ व उर्दू माध्यमात एक हजार २२२ असे एकूण आठ हजार ६६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी २०२ शिक्षकांची पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात १८० शिक्षक सध्या कार्यरत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा शिक्षण विभाग अस्तित्वात असून त्याचा कारभार राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले शिक्षणाधिकारी व पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सुरू आहे. याखेरीज पालिकेकडे स्वतंत्र पर्यवेक्षण यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढवण्यासह शाळांत विविध उपक्रम व भौतिक सुविधा पुरवण्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी खाजगी संस्थांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय महापौर डिम्पल मेहता, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त बालाजी खतगावकर, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी मुंबई व मीरा-भार्इंदरमधील खाजगी संस्थांची मदत घेण्याचे निश्चित केले. या संस्थांद्वारे पालिका शाळांतील स्वच्छता व सुरक्षिततेवर विनामूल्य काम करणे गृहीत धरण्यात आले असून मात्र त्यांचा पालिकेच्या तसेच शाळेच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षतासुद्धा घेण्याचे प्रस्तावित केले आहे.>विनामोबदला सेवाशाळेला वेळोवेळी आवश्यकता भासल्यास त्या संस्थांद्वारे शैक्षणिक मदत, शाळेसह शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी बालक-पालक प्रबोधन आदी पूरक सेवा त्या संस्थांना द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी त्या संस्थांना पालिकेकडून कोणताही मोबदला दिला जाणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट केले आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून त्याच्या मान्यतेसाठी तो येत्या महासभेपुढे सादर केला जाणार आहे.