शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू, पण ST बंद; विद्यार्थ्यांची रोज सात-आठ किलोमीटर पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:19 IST

आजारी विद्यार्थ्यांना होतो त्रास; शिक्षणावर परिणाम

जनार्दन भेरेभातसानगर : एसटी बंदचा फटका शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना बसत असल्याने शिक्षणासाठी सहा ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा व विद्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थी हैराण झाले असून पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

एसटी बंद असल्याने भातसानगर माध्यमिक विद्यालयात कळमगाव कानविंदे, लाहे, बिरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना सहा ते सात किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागत आहे. किसान हायस्कूल नडगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी शिरगाव, शेंद्रूण, जांभे, लेनाड, नेहरोली, ठिळे हायस्कूलमध्ये टेभरे, किन्हवली हायस्कूलमध्ये परिसरातील यापेक्षा अधिक अंतरावरून खर्डी, कसारा अशा तालुक्यांतील सर्वच हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजची पायपीट करून शाळेत यावे लागत आहे.

काही शाळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान भरतात दुपारी सुटतात, तर काही भरून संध्याकाळी सुटतात. त्या विद्यार्थ्यांना सकाळी एक तास आधीच घरातून निघावे लागत आहे. तर दुपारी भर उन्हात चालत यावे लागत आहे. संध्याकाळी सुटणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी रात्र होत असते. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्याने थकलेली मुले लवकर झोपी जातात. जाण्या-येण्याने आधीचा वेळही वाया जातो. याशिवाय दूर गावांना जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी ससेहोलपट होत असून अनेक यात्रा करणाऱ्या भाविकांना ही एसटी नसल्याने जाता येत नाही. शिवाय, खासगी बस या परवडणाऱ्या नसल्याने सर्वांची मोठी पंचाईत झाली आहे.

दीक्षा गोरे या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या किसान हायस्कूलच्या विद्यार्थिनीने सांगितले की, एसटी बंद असल्याने आम्हाला दररोज सहा किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. हा दररोजचा प्रवास असल्याने आम्ही थकून जातो. तर शुभम पाटोळे या विद्यार्थ्यानेही ही अशीच प्रतिक्रिया दिली.बस बंद असल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे; मात्र खासगी जीप ही वेळेवर नसल्याने मुलांची ससेहोलपट होत आहे.वैदेही नार्वेकर, माजी नगराध्यक्षखासगी प्रवासाचा भुर्दंड

  • महामारीनंतर तालुक्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. आता बस बंदचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 
  • दररोजच्या चाकरमानी, नाकाकामगार, शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच दररोजच्या रोजी-रोटीसाठी शहराकडे जाणाऱ्यांना स्वतःची वाहने नसल्याने व पेट्रोल, डिझेल यांचे गगनाला भिडलेल्या भावामुळे परवडणारे नसल्याने त्यांचीही एसटी बंदमुळे मोठी कोंडी झाली आहे. 
  • आदिवासी कातकरी यांना खासगी जीपचे दर परवडणारे नसल्याने त्यांचीही मोठी पंचायत झाली आहे. शिवाय खासगी जीपवाले अधिक भाडे आकारणी करीत असल्याने आर्थिक ताण पालकांच्या खिशावर पडत आहे.
टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र