शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शाळा सुरू, पण ST बंद; विद्यार्थ्यांची रोज सात-आठ किलोमीटर पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:19 IST

आजारी विद्यार्थ्यांना होतो त्रास; शिक्षणावर परिणाम

जनार्दन भेरेभातसानगर : एसटी बंदचा फटका शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना बसत असल्याने शिक्षणासाठी सहा ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा व विद्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थी हैराण झाले असून पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

एसटी बंद असल्याने भातसानगर माध्यमिक विद्यालयात कळमगाव कानविंदे, लाहे, बिरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना सहा ते सात किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागत आहे. किसान हायस्कूल नडगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी शिरगाव, शेंद्रूण, जांभे, लेनाड, नेहरोली, ठिळे हायस्कूलमध्ये टेभरे, किन्हवली हायस्कूलमध्ये परिसरातील यापेक्षा अधिक अंतरावरून खर्डी, कसारा अशा तालुक्यांतील सर्वच हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजची पायपीट करून शाळेत यावे लागत आहे.

काही शाळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान भरतात दुपारी सुटतात, तर काही भरून संध्याकाळी सुटतात. त्या विद्यार्थ्यांना सकाळी एक तास आधीच घरातून निघावे लागत आहे. तर दुपारी भर उन्हात चालत यावे लागत आहे. संध्याकाळी सुटणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी रात्र होत असते. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्याने थकलेली मुले लवकर झोपी जातात. जाण्या-येण्याने आधीचा वेळही वाया जातो. याशिवाय दूर गावांना जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी ससेहोलपट होत असून अनेक यात्रा करणाऱ्या भाविकांना ही एसटी नसल्याने जाता येत नाही. शिवाय, खासगी बस या परवडणाऱ्या नसल्याने सर्वांची मोठी पंचाईत झाली आहे.

दीक्षा गोरे या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या किसान हायस्कूलच्या विद्यार्थिनीने सांगितले की, एसटी बंद असल्याने आम्हाला दररोज सहा किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. हा दररोजचा प्रवास असल्याने आम्ही थकून जातो. तर शुभम पाटोळे या विद्यार्थ्यानेही ही अशीच प्रतिक्रिया दिली.बस बंद असल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे; मात्र खासगी जीप ही वेळेवर नसल्याने मुलांची ससेहोलपट होत आहे.वैदेही नार्वेकर, माजी नगराध्यक्षखासगी प्रवासाचा भुर्दंड

  • महामारीनंतर तालुक्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. आता बस बंदचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 
  • दररोजच्या चाकरमानी, नाकाकामगार, शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच दररोजच्या रोजी-रोटीसाठी शहराकडे जाणाऱ्यांना स्वतःची वाहने नसल्याने व पेट्रोल, डिझेल यांचे गगनाला भिडलेल्या भावामुळे परवडणारे नसल्याने त्यांचीही एसटी बंदमुळे मोठी कोंडी झाली आहे. 
  • आदिवासी कातकरी यांना खासगी जीपचे दर परवडणारे नसल्याने त्यांचीही मोठी पंचायत झाली आहे. शिवाय खासगी जीपवाले अधिक भाडे आकारणी करीत असल्याने आर्थिक ताण पालकांच्या खिशावर पडत आहे.
टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र