शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 03:16 IST

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

ठाणे : ठाणे शहराचा काही भाग, घोडबंदरसह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणीपुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींद्वारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणीबचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.>यंदा महिनाआधीच पाणीकपातजिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊनगेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणीकपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ती १४ टक्के लागू केली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीची २२ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.>अशी होईल दिवसनिहाय कपातसोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हास नदीतून पाणी उचलणाºया एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे. कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे ठाणेच्या काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा-भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहील. अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणीबचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणीकपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी