शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 03:16 IST

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

ठाणे : ठाणे शहराचा काही भाग, घोडबंदरसह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणीपुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींद्वारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणीबचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.>यंदा महिनाआधीच पाणीकपातजिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊनगेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणीकपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ती १४ टक्के लागू केली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीची २२ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.>अशी होईल दिवसनिहाय कपातसोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हास नदीतून पाणी उचलणाºया एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे. कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे ठाणेच्या काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा-भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहील. अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणीबचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणीकपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी