शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

जिल्ह्यावर टंचाईची कु-हाड, २२ टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 03:16 IST

अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

ठाणे : ठाणे शहराचा काही भाग, घोडबंदरसह जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भार्इंदर या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर या नगरपालिका आणि एमआयडीसी आदींना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २२ टक्के पाणीकपातीस २२ आॅक्टोबर अर्थात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवण्याची सक्ती आता लागू झाली आहे.बारवी धरणासह उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणात ठाणे जिल्ह्यात वर्षभर होणाºया पाणीपुरवठ्यात २२ टक्के तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवड्यातून २२ टक्के पाणीकपातीचा निर्णय लघू पाटबंधारे विभागाने घेतला. एमआयडीसी, केडीएमसी, स्टेम आणि एमजेपी आदींद्वारे ठिकठिकाणच्या शहरांना रोज सुमारे एक हजार १९२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्यातून आठवड्याभरात २२ टक्के पाणीबचत करायची आहे. यामुळे महापालिकांनी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.>यंदा महिनाआधीच पाणीकपातजिल्ह्यात सक्तीने लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आगामी दिवाळी, ईद आदी सणासुदीच्या काळात मात्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे सणवाराच्या कालावधीत मात्र मनसोक्त नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धरणातील पाण्यातील तूट लक्षात घेऊनगेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधी ही सक्तीची पाणीकपात लागू करावी लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून ती १४ टक्के लागू केली होती. मात्र, नंतर फेब्रुवारी, मार्चला ती ७ टक्के केली होती. त्यानंतर ती रद्द केली होती. आता धरणातील कमी साठा लक्षात घेऊन लघूपाटबंधारे विभागाने सक्तीची २२ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार महापालिकांसह एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदींना तो सक्तीने पाळावा लागणार आहे.>अशी होईल दिवसनिहाय कपातसोमवारपासून ही सक्तीची पाणी कपात लागू झाली आहे. यानुसार बारवी धरणासह उल्हास नदीतून पाणी उचलणाºया एमआयडीसीचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा आता शुक्रवारी या एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यामुळे एमआयडीसीकडून सुमारे ५८३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होणार आहे. कल्याण - डोंबिवलीचा २३४ एलएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येईल. यामुळे ठाणेच्या काही भागांसह भिवंडी मनपासह मीरा-भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील गावखे्यांचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहील. अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी पुरवठा बंद ठेवणार आहे. यामुळे ९० एमएलडी पाणीबचत एमजेपीकडून बचत होणार आहे. या पाणीकपातीमुळे बचत होणारे धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी