शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

ग्रामीण भागांत टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 03:03 IST

उपाययोजना मात्र कागदावरच : जिल्ह्यातील ३३१ बोअरवेलचे प्रस्ताव धूळखात

सुरेश लोखंडेठाणे : उपलब्ध पाणीपुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन महापालिकांसह औद्योगिक क्षेत्रासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात सुरू झाली. या शहरी कपातीपेक्षाही जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील ८८ गावे आणि २३० आदिवासीपाड्यांमध्ये पाणीटंचाई कमीअधिक प्रमाणात सुरू झाली आहे. यावरील उपाययोजनेचा आराखडा मात्र अजूनही धूळखात पडून आहे.

शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे ग्रामीण, दुर्गम भागात जाळे पसरले आहे. मात्र, त्यापासून जवळ असलेल्या गावखेड्यांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जी व निष्काळजीमुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहातील पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत. अर्धवट असलेल्या या योजनांच्या गावातील पाणीटंचाईवरील उपाययोजनेसाठी साधी बोअरवेलही घेता येत नाही. यंदाही ८८ गावे आणि २३० पाडे आदी ३१८ गावपाड्यांमध्ये यंदा तीव्र पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासाठी सुमारे ३३१ बोअरवेल घेण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हा प्रस्ताव सत्ताधारी व अधिकाºयांच्या निरुत्साहामुळे धूळखात पडून आहे.

जिल्हा कागदोपत्री टँकर व पाणीटंचाईमुक्त आहे. मात्र, दरवर्षी शेकडो गावे या पाणीटंचाईमुळे होरपळले जात आहेत. यंदाप्रमाणे मागील वर्षीदेखील ४४८ गावखेड्यांमधील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचे नियोजन केले होते. यामध्ये १२१ मोठी गावे आणि ३२७ पाड्यांचा समावेश होता. त्यासाठी सहा कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले होते. तरीही, बहुतांशी गावपाडे या उपाययोजनांपासून वंचित ठेवल्याचे सदस्यांकडून ऐकायला मिळत आहे. यंदा शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे आणि १८३ पाडे पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात आहेत. त्यावरील उपाययोजनेसाठी सुमारे ६८ बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे. याखालोखाल मुरबाड तालुक्याच्या दुर्गम व डोंगराळ भागातील १८ गावे आणि ३३ पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६४ बोअरिंग निश्चित केल्या आहेत.भिवंडीतील तीन गावांमध्ये ठणठणाटभिवंडी तालुक्यात तीन गावे आणि सहा पाड्यांवर पाणीटंचाई आहे. त्यासाठी या तालुक्यामध्ये यंदा सुमारे ११० बोअरवेलचे नियोजन आहे. अंबरनाथमध्ये दोन गावे आणि आठ पाडे टंचाईग्रस्त म्हणून आहेत. या तालुक्यांमध्ये ४५ बोअरवेल घेतल्या जाणार आहेत. कल्याण तालुक्यातही यंदा ४५ बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे. प्राप्त निधीअभावी या बोअरवेलची संख्या कमी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. पण, या टंचाईवरील उपाययोजना मंजुरीअभावी अद्याप कागदावर आहे. त्यावर वेळीच लक्ष केंद्रित करून जीवघेणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका