शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अर्नाळ्यात रेतीचोरी सुुरूच

By admin | Updated: March 11, 2016 02:15 IST

अर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला

शशी करपे, वसईअर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला अर्नाळ्याच्या गावकऱ्यांनी शनिवारी रात्री रेतीची वाहतूक करणारी गाडी पकडून देऊन सणसणीत चपराक लगावली. अर्नाळा समुद्रकिनारी गेल्या काही वर्षांपासून बेकायदा रेती उत्खनन करून वसईतील विविध भागात चोरटी वाहतूक केली जात आहे. रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत रेती चोरीचा धंदा अव्याहतपणे सुरु आहे. पोलीस आणि महसूल अधूनमधून कारवाईचे ढोंग करून गावकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. पण, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रेती चोरी हा येथील मुख्य व्यवसाय बनला आहे. समुद्रकिनारी एसटी पाडा नावाची मजूरांची मोठी वस्ती आहे. रेती उत्खननासाठी या मजूरांचा वापर केला जातो. एका गोणीमागे प्रत्येकी पाच रुपये मजूरी दिली जाते. रात्रभर वीस पंचवीस मजूर किमान पाचशेच्या आसपास गोण्या भरून रेती काढून किनाऱ्यावर टेम्पोत भरण्याचे काम करतात. रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोणताही नंबर किंवा कागदपत्रे नसल्याने गाडी पकडली गेली की ड्रायव्हर गाडी सोडून फरार होतो. पण, नंतर त्याच गाड्याने रेती वाहतूक केली जाते, अशी माहिती उपसरपंच सतीश तांडेल यांनी दिली. मजूरांवर कारवाई झाली की काही स्थानिक नेते त्यांची पोलिसांकडून सुटका करवून घेतात. त्यामुळे रेती चोरांना स्थानिक मजूर सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत. याठिकाणी नियमितपणे गस्त घातली जाते असे महसूल आणि पोलीस सांगतात. पण, आतापर्यंत गावकऱ्यांनीच रेतीच्या गाड्या पकडून दिल्या आहेत. परवा रात्री चोरटी रेती वाहून नेणारी एक गाडी गावातील काही लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली. गाडी पकडल्यावर ड्रायव्हर नेहमीप्रमाणे गायब झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. दरम्यान, भाजपाच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन गावातील नैसर्गिक समुद्रकिनारा उध्वस्त करणारी रेती चोरी ताबडतोब रोखण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा चिटणीस भरत भोईर, तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, रामदास मेहेर, दयानंद भोईर आणि प्रभाकर वैती यांचा शिष्टमंडळात समावेश होता. रेती चोरीमुळे नैसर्गिक बंधारा उध्वस्त होऊ लागला आहे. किनाऱ्यावर मोठाले खड्डे पडू लागले आहेत. परिणामी मोठी भरती आणि पावसाळ्यात उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा धोक आहे, अशी भीती तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.