शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

अर्नाळ्यात रेतीचोरी सुुरूच

By admin | Updated: March 11, 2016 02:15 IST

अर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला

शशी करपे, वसईअर्नाळा समुद्रकिनारी रेती चोरी होत असल्याची सविस्तर माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरही रेती चोरी होत नसल्याचा दावा करणाऱ्या महसूल आणि पोलीस खात्याला अर्नाळ्याच्या गावकऱ्यांनी शनिवारी रात्री रेतीची वाहतूक करणारी गाडी पकडून देऊन सणसणीत चपराक लगावली. अर्नाळा समुद्रकिनारी गेल्या काही वर्षांपासून बेकायदा रेती उत्खनन करून वसईतील विविध भागात चोरटी वाहतूक केली जात आहे. रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत रेती चोरीचा धंदा अव्याहतपणे सुरु आहे. पोलीस आणि महसूल अधूनमधून कारवाईचे ढोंग करून गावकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. पण, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रेती चोरी हा येथील मुख्य व्यवसाय बनला आहे. समुद्रकिनारी एसटी पाडा नावाची मजूरांची मोठी वस्ती आहे. रेती उत्खननासाठी या मजूरांचा वापर केला जातो. एका गोणीमागे प्रत्येकी पाच रुपये मजूरी दिली जाते. रात्रभर वीस पंचवीस मजूर किमान पाचशेच्या आसपास गोण्या भरून रेती काढून किनाऱ्यावर टेम्पोत भरण्याचे काम करतात. रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोणताही नंबर किंवा कागदपत्रे नसल्याने गाडी पकडली गेली की ड्रायव्हर गाडी सोडून फरार होतो. पण, नंतर त्याच गाड्याने रेती वाहतूक केली जाते, अशी माहिती उपसरपंच सतीश तांडेल यांनी दिली. मजूरांवर कारवाई झाली की काही स्थानिक नेते त्यांची पोलिसांकडून सुटका करवून घेतात. त्यामुळे रेती चोरांना स्थानिक मजूर सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत. याठिकाणी नियमितपणे गस्त घातली जाते असे महसूल आणि पोलीस सांगतात. पण, आतापर्यंत गावकऱ्यांनीच रेतीच्या गाड्या पकडून दिल्या आहेत. परवा रात्री चोरटी रेती वाहून नेणारी एक गाडी गावातील काही लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली. गाडी पकडल्यावर ड्रायव्हर नेहमीप्रमाणे गायब झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. दरम्यान, भाजपाच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन गावातील नैसर्गिक समुद्रकिनारा उध्वस्त करणारी रेती चोरी ताबडतोब रोखण्यात यावी अशी मागणी केली. जिल्हा चिटणीस भरत भोईर, तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, रामदास मेहेर, दयानंद भोईर आणि प्रभाकर वैती यांचा शिष्टमंडळात समावेश होता. रेती चोरीमुळे नैसर्गिक बंधारा उध्वस्त होऊ लागला आहे. किनाऱ्यावर मोठाले खड्डे पडू लागले आहेत. परिणामी मोठी भरती आणि पावसाळ्यात उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा धोक आहे, अशी भीती तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.