शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

सरनाईक जमीन प्रकरण; जबाबासाठी ईडीची जबरदस्ती, बिल्डरच्या पत्नीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 08:09 IST

टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याकरिता ईडीची टीम कल्याण पश्चिमेतील देशमुख यांच्या बंगल्यात पोहोचली. देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

कल्याण: कल्याण पश्चिम गोदरेज हिल येथील ‘विराजमान’ या बंगल्यात वास्तव्य करीत असलेले बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख यांना कोरोना झाला असतानाही ईडीचे पथक मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानात घुसले व देशमुख यांना आपल्यासोबत जबाब देण्याकरिता येण्यासाठी जबरदस्ती करीत होते. शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमचा जमीन व्यवहार झाला नसतानाही तो झाला आहे व त्याकरिता सरनाईक यांनी मनी लॉड्रिंगमधून पैसे उभे केले, असा जबाब देण्याकरिता देशमुख यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांनी केला.

टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याकरिता ईडीची टीम कल्याण पश्चिमेतील देशमुख यांच्या बंगल्यात पोहोचली. देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. असे असतानाही ईडीच्या टीमने देशमुख यांच्या बंगल्यात प्रवेश केला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत शीतल देशमुख यांचा वाद झाला. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार झालेला नाही. तरीही गेले काही दिवस ईडीचे अधिकारी आम्हाला नाहक त्रास देऊन घाणेरडे राजकारण करीत आहेत, असे शीतल यांचे म्हणणे आहे. सरनाईक यांनी गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदी केली असून ईडीने ती जप्त केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 

 मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कल्याणमध्ये देशमुख यांच्या बंगल्यावर पोहोचले. या पथकात दहा अधिकारी होते. त्यापैकी केवळ एक महिला अधिकारी होती. शीतल म्हणाल्या की, माझे पती योगेश यांना कोरोना झाल्यामुळे आमच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आला आहे. पतीला जबाब देण्याकरिता मुंबईला नेण्याकरिता जबरदस्ती करू नका, असे सांगूनदेखील ईडीचे अधिकारी ऐकत नव्हते. कोरोना नियमावली ईडीच्या अधिकाऱ्यांना लागू नाही का, ईडीला त्या नियमावलीचे उल्लंघन करण्याचा परवाना दिला आहे का, असे सवाल शीतल यांनी केले. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार आर्थिक कारणास्तव  रद्द झाला.  यासंदर्भात आमची केस सुरू आहे. हे ईडीला सांगूनही सररनाईक यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी जमीन खरेदीकरिता पैसा मनी लॉड्रिंगमधून उभा केला असा जवाब देण्याकरिता ईडी योगेश यांच्यावर दबाव टाकत असल्याचा दावा शीतल यांनी केला.

घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप ईडीला सरनाईक यांच्या विरोधात भक्कम दावा दाखल करायचा असेल पण त्याकरिता घाणेरडे राजकारण सुरू आहे. या राजकारणात आम्ही, शेतकरी आणि मध्यस्थ भरडले जात आहोत. त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, असे शीतल म्हणाल्या. शीतल देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत ईडीचे म्हणणे समजू शकले नाही.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयkalyanकल्याण