शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

सरनाईक जमीन प्रकरण; जबाबासाठी ईडीची जबरदस्ती, बिल्डरच्या पत्नीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 08:09 IST

टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याकरिता ईडीची टीम कल्याण पश्चिमेतील देशमुख यांच्या बंगल्यात पोहोचली. देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

कल्याण: कल्याण पश्चिम गोदरेज हिल येथील ‘विराजमान’ या बंगल्यात वास्तव्य करीत असलेले बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख यांना कोरोना झाला असतानाही ईडीचे पथक मंगळवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानात घुसले व देशमुख यांना आपल्यासोबत जबाब देण्याकरिता येण्यासाठी जबरदस्ती करीत होते. शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमचा जमीन व्यवहार झाला नसतानाही तो झाला आहे व त्याकरिता सरनाईक यांनी मनी लॉड्रिंगमधून पैसे उभे केले, असा जबाब देण्याकरिता देशमुख यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांनी केला.

टिटवाळा नजीक गुरुवली येथील जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याकरिता ईडीची टीम कल्याण पश्चिमेतील देशमुख यांच्या बंगल्यात पोहोचली. देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. असे असतानाही ईडीच्या टीमने देशमुख यांच्या बंगल्यात प्रवेश केला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत शीतल देशमुख यांचा वाद झाला. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार झालेला नाही. तरीही गेले काही दिवस ईडीचे अधिकारी आम्हाला नाहक त्रास देऊन घाणेरडे राजकारण करीत आहेत, असे शीतल यांचे म्हणणे आहे. सरनाईक यांनी गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदी केली असून ईडीने ती जप्त केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. 

 मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कल्याणमध्ये देशमुख यांच्या बंगल्यावर पोहोचले. या पथकात दहा अधिकारी होते. त्यापैकी केवळ एक महिला अधिकारी होती. शीतल म्हणाल्या की, माझे पती योगेश यांना कोरोना झाल्यामुळे आमच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आला आहे. पतीला जबाब देण्याकरिता मुंबईला नेण्याकरिता जबरदस्ती करू नका, असे सांगूनदेखील ईडीचे अधिकारी ऐकत नव्हते. कोरोना नियमावली ईडीच्या अधिकाऱ्यांना लागू नाही का, ईडीला त्या नियमावलीचे उल्लंघन करण्याचा परवाना दिला आहे का, असे सवाल शीतल यांनी केले. सरनाईक यांच्यासोबत आमचा जमिनीचा व्यवहार आर्थिक कारणास्तव  रद्द झाला.  यासंदर्भात आमची केस सुरू आहे. हे ईडीला सांगूनही सररनाईक यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी जमीन खरेदीकरिता पैसा मनी लॉड्रिंगमधून उभा केला असा जवाब देण्याकरिता ईडी योगेश यांच्यावर दबाव टाकत असल्याचा दावा शीतल यांनी केला.

घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप ईडीला सरनाईक यांच्या विरोधात भक्कम दावा दाखल करायचा असेल पण त्याकरिता घाणेरडे राजकारण सुरू आहे. या राजकारणात आम्ही, शेतकरी आणि मध्यस्थ भरडले जात आहोत. त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, असे शीतल म्हणाल्या. शीतल देशमुख यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत ईडीचे म्हणणे समजू शकले नाही.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयkalyanकल्याण