शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरण; एल्गार मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर

By नितीन पंडित | Updated: February 28, 2024 19:55 IST

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला.

भिवंडी : धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन दलित तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन नेते ऍड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम दादा गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आंबेडकरी कार्यकर्ते साकी गायकवाड, अहमदनगर येथील आंबेडकरी कार्यकर्ते प्रदीप थोरात,कॉम्रेड एड. उदय चौधरी,रवींद्र चौधरी,राहुल सोळंखी,सुमित्र कांबळे,शाहूराज साठे,ऍड.दिलीप वाळंज,रवींद्र चंदणे,यांच्यासह भिवंडीसह ठाणे,पालघर,पुणे व अहमद नगर येथील आंबेडकर अनुयायांसह पीडित संकेत भोसले यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वंजारपट्टी नाका मार्गे भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आपल्या मागण्यांचे निवेदन पीडित संकेत भोसले यांच्या आईसह मोर्चाचे आयोजक किरण चन्ने हे प्रांताधिकारी कार्यालयात घेऊन गेले असता भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप हे कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांचा राग अनावर होत चन्ने यांनी प्रांत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत निवेदन देण्यास नकार दिला.त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्याकडे दिले.

मयत संकेत भोसले यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,फरार सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. भिवंडीत शिवा बनसोडे,विकास कांबळे,विकी ढेपे या तरुणांची देखील हत्या झाली होती.या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्याने मयत तरुणांना आजही न्याय मिळाला नाही त्यामुळे जोपर्यंत मयत संकेत भोसले त्याच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन यापुढेही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया मोर्चाचे संयोजक एडवोकेट किरण चन्ने यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी