शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची शेतीकामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:32 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.

ठाणे : दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत.रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. मागील २४ तासांच्या कालावधीत सरासरी १७९.३४ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली.ठाणे शहरात एका जुन्या इमारतीच्या दोन मजल्यांसह एक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली.जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या या पावसाची सरासरी १७९.३४ मिमी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी १०१७.७० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८२.२० मिमी म्हणजे सरासरी १६४.४६ मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४८.२५ टक्के पाऊस पडला आहे.शहरांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ११२ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत या धरणात ११८.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. यामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी तो ५८ टक्के होता. भातसामध्ये केवळ ४४ मिमी, मोडकसागरमध्ये ११८, आंध्रात केवळ ५१ मिमी पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडला.बारवी धरणात ५.५७ टक्के पाणीसाठा तयार झाला. आतापर्यंत या धरणात ७७५ मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच भातसा धरणात दोन दिवसांच्या कालावधीत तीन टक्के पाणीसाठा वाढून तो ४५ टक्के झाला. मागील वर्षी या दिवसापर्यंत भातसामध्ये ५३ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी तो केवळ ६५ टक्के होता.जुन्या इमारतीचे दोन मजले कोसळलेठाणे शहरातील शाहू मार्केटजवळील जुन्या इमारतीचे दोन मजले पडले. ही धोकादायक इमारत असल्यामुळे त्यात कोणीही रहिवासी नव्हते. त्यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री ही इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे.दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील अजमेरनगर टेकडीवरील २६ कुटुंबांतील १५६ नागरिकांना रविवारी नारपोली येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे