शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

पावसाची शेतीकामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:32 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.

ठाणे : दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत.रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. मागील २४ तासांच्या कालावधीत सरासरी १७९.३४ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली.ठाणे शहरात एका जुन्या इमारतीच्या दोन मजल्यांसह एक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली.जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या या पावसाची सरासरी १७९.३४ मिमी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी १०१७.७० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८२.२० मिमी म्हणजे सरासरी १६४.४६ मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४८.२५ टक्के पाऊस पडला आहे.शहरांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ११२ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत या धरणात ११८.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. यामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी तो ५८ टक्के होता. भातसामध्ये केवळ ४४ मिमी, मोडकसागरमध्ये ११८, आंध्रात केवळ ५१ मिमी पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडला.बारवी धरणात ५.५७ टक्के पाणीसाठा तयार झाला. आतापर्यंत या धरणात ७७५ मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच भातसा धरणात दोन दिवसांच्या कालावधीत तीन टक्के पाणीसाठा वाढून तो ४५ टक्के झाला. मागील वर्षी या दिवसापर्यंत भातसामध्ये ५३ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी तो केवळ ६५ टक्के होता.जुन्या इमारतीचे दोन मजले कोसळलेठाणे शहरातील शाहू मार्केटजवळील जुन्या इमारतीचे दोन मजले पडले. ही धोकादायक इमारत असल्यामुळे त्यात कोणीही रहिवासी नव्हते. त्यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री ही इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे.दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील अजमेरनगर टेकडीवरील २६ कुटुंबांतील १५६ नागरिकांना रविवारी नारपोली येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे