शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची शेतीकामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:32 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.

ठाणे : दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारी पावसाने जराशी विश्रांती घेताच, ग्रामीण भागात भातलावणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत.रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. मागील २४ तासांच्या कालावधीत सरासरी १७९.३४ मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली.ठाणे शहरात एका जुन्या इमारतीच्या दोन मजल्यांसह एक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वंदना टॉकीजसमोर व अन्य ठिकाणी झाडे उन्मळून पडली.जिल्ह्यात मुसळधार पडलेल्या या पावसाची सरासरी १७९.३४ मिमी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी १०१७.७० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत ११८२.२० मिमी म्हणजे सरासरी १६४.४६ मिमी जादा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत ४८.२५ टक्के पाऊस पडला आहे.शहरांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ११२ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत या धरणात ११८.५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला. यामध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी तो ५८ टक्के होता. भातसामध्ये केवळ ४४ मिमी, मोडकसागरमध्ये ११८, आंध्रात केवळ ५१ मिमी पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडला.बारवी धरणात ५.५७ टक्के पाणीसाठा तयार झाला. आतापर्यंत या धरणात ७७५ मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच भातसा धरणात दोन दिवसांच्या कालावधीत तीन टक्के पाणीसाठा वाढून तो ४५ टक्के झाला. मागील वर्षी या दिवसापर्यंत भातसामध्ये ५३ टक्के पाणीसाठा होता. मोडकसागरमध्ये ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी तो केवळ ६५ टक्के होता.जुन्या इमारतीचे दोन मजले कोसळलेठाणे शहरातील शाहू मार्केटजवळील जुन्या इमारतीचे दोन मजले पडले. ही धोकादायक इमारत असल्यामुळे त्यात कोणीही रहिवासी नव्हते. त्यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री ही इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात ३८० मिमी, तर याखालोखाल कल्याण तालुक्यात २४५ मिमी, अंबरनाथला १९२, उल्हासनगरला १८६, ठाण्याला १२५, मुरबाडला ६७ आणि शहापूर तालुक्यात केवळ ६० मिमी पाऊस पडला आहे.दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील अजमेरनगर टेकडीवरील २६ कुटुंबांतील १५६ नागरिकांना रविवारी नारपोली येथील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे