शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी धुळे ते मंत्रालय मुंबई दरम्यान संघर्ष पदयात्रा

By नितीन पंडित | Updated: November 26, 2023 16:40 IST

टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार समाज भिवंडीत दाखल

भिवंडी: राज्य घटनेने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण दिलेल्या महाराष्ट्रातील विशेषत: खान्देश भागातील टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी समाजबांधवांना जातीच्या दाखल्यापासून वंचित ठेवले जात आहे. तर अनेकांची जात पडताळणी केली जात नाही. त्यामुळे आज ही समाजातील मोठा वर्ग सोयी सुविधा पासून वंचित असल्याने त्या न्याय हक्का साठी धुळे ते मुंबई मंत्रालय येथ पर्यंत संघर्ष पदयात्रेचे आयोजन आदिवासी वाल्मीकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले आहे.धुळे येथील एकवीरा मंदिर येथून १७ नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही पदयात्रा रविवारी भिवंडी तालुक्यात दाखल झाली. सोनाळे येथे पदयात्रेत सहभागी समाज बांधवांचे राम लहारे,देवा फाऊंडेशन चे तानाजी मोरे,साई सेवा संस्थेचे विसुभाऊ म्हात्रे यांनी स्वागत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित खान्देश भागातील असताना आदिवासी असल्याचा आरक्षणाचा फायदा त्यांनी घ्यायचा व आम्हाला मिळू द्यायचा नाही असे षडयंत्र सुरू आहे .त्यासाठी ही संघर्ष यात्रा घेऊन मुंबई येथे निघाली असल्याचा सांगत मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार खासदार व मुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्यांवर चर्चा करून तात्काळ निर्णय द्यावा अशी मागणी यात्रेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे .

प्रशासनाचे दुर्लक्ष,पदयात्री जखमी 

दहा दिवस रस्त्याने उन्हातान्हाची परवा न करता तब्बल तीनशे किलोमीटर चालत निघाला असताना शासकीय प्रशासनाने या आंदोलनाकडे ढुंकून ही पाहिले नाही फक्त रस्त्यात पोलिस प्रशासनाने वेळोवेळी मदत केली अशी खंत शाना भाऊ सोनवणे यांनी बोलून दाखवली.तर या पदयात्रे मध्ये चालून चालून अनेकांच्या पायांना जखमा झाल्या आहेत.त्यामध्ये शनिवारी रात्री काही महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.