शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आदिवासींच्या जमीन खरेदी-विक्रीची कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:07 IST

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय : दहा वर्षांच्या व्यवहाराची पडताळणी. कोकण विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती ही चौकशी करणार असून, आपला अहवाल दोन महिन्यांत शासनास सादर करणार आहे.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील आरे कॉलनी, ठाण्यातील येऊर असो वा रायगडचा माथेरानचा निसर्गरम्य परिसर, नाशिकच्या इगतपुरी, भंडारदरा किंवा अमरावतीच्या चिखलदऱ्यात आपल्या मौजमजेसाठी अनेक धनिकांनी आदिवासींच्या जमिनींची खरेदी करून त्यावर आलिशान फार्म हाऊस, बंगले बांधले आहेत. हे करताना अनेक व्यवहारात आदिवासी, जमीन महसूल कायदे धाब्यावर बसवून आदिवासींची केलेल्या फसवणुकीच्या तक्रारींसह गेल्या दहा वर्षांत अशा प्रकारे झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

कोकण विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती ही चौकशी करणार असून, आपला अहवाल दोन महिन्यांत शासनास सादर करणार आहे.राज्यातील १३ जिल्ह्यात ५० हजार ५५७ चौरस किलाेमीटर क्षेत्रांत आदिवासीचे वास्तव्य असून, यात वन जमिनीसह मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतजमीन आहे. निसर्गाच्या कुशीत या शेतजमिनी असल्याने अनेकांनी त्या साध्या करारनाम्यावर खरेदी करून त्यावर आपले फार्म हाऊस, बंगले बांधले आहेत. मुंबईतील आरे कॉलनी, ठाण्यातील येऊर, रायगडमधील माथेरान किंवा समुद्रकाठचा निसर्गरम्य परिसर किंवा चिखलदरा, भंडारदरा, इगतपुरी यासारख्या थंड हवेच्या ठिकाणांचा यात समावेश आहे. या ठिकाणी उद्योजक, बिल्डर, सिनेकलाकार, राज्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या चार लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या एक लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे, तर पालघर जिल्ह्यातील लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात नऊ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. यातील अनेक आदिवासींना भूमिहीन करून त्यांच्या शेतजमिनी अकृषिक वापरासाठी कायदे धाब्यावर बसवून खरेदी केल्या आहेत. अशाच एका व्यवहाराबाबत वरोराचे आमदार सुरेश धानोरकर यांनी २०१७ च्या अधिवेशनात प्रश्न केला असता तत्कालीन अध्यक्षांनी अशा प्रकारच्या राज्यातील सर्व व्यवहारांची खोलात चौकशीचे निर्देश दिले हाेते. आता तीन वर्षांनंतर का होईना महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांत आदिवासी जमीन खरेदी-विक्रीचे किती व्यवहार झाले, कोणाची फसवणूक झाली, याची दोन महिन्यांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रपतींच्या अधिकारांवर अतिक्रमणराज्यांत गेल्या अनेक वर्षांत आदिवासींच्या जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारांत मोठा गैरव्यवहार झाला आहे. आदिवासींच्या एका कायद्याच्या कलम-३६ व ३६ ब नुसार राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय आदिवासींची जमीन खरेदी करता येत नाही. याबाबत एकनाथ खडसे ते बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंतच्या सर्व महसूलमंत्र्यांकडे मी आमदार, खासदार म्हणून वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, पळवाटा शोधून आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांवर अतिक्रमण करून राज्यात आदिवासी जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. आता कोकण आयुक्तांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर केला, तर मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल, असे राज्याचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ‘लोकमत’ला सांगितले.