शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

साई प्लेटेनियम रूग्णालय प्रकरणी; शिवसेना विरूद्ध भाजपा - मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:39 IST

शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांची धडपळ

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी कोविड साई प्लॅटीनियम रूग्णालया विरोधात विरोधकानी बागुलबुवा रंगविण्याचा आरोप महापौर लीलाबाई अशान यांनी केला. ऐण कोरोना महामारीत साई प्लॉटिनियम एकमेव कोविड रुग्णालय उभे राहिल्याने असंख्य जणाचा जीव वाचविल्यांची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णासाठी शहरात एकमेव कोविड साई प्लॅटनियम रुग्णालय उभारण्यात आले. रुग्णालयातील सर्वच बेड ऑक्सीजन युक्त करण्यासाठी महापालिकेने १८ लाख खर्च केल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्या वरून वाद निर्माण झाला. सुरवातीला मनसे यांनी रुग्णालय विरोधात आवाज उठविल्यानंतर आता भाजपही विरोधात उभी ठाकली. कोरोना संशयित व कोरोना रुग्णावर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय भित होते. अशावेळी साई प्लॅटनियम रुग्णालय, कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी पुढे आल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ पॉल यांनी दिली. गेल्या दोन अद्दिच महिन्यात ७०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णावर उपचार केले असून ते ठणठणीत घरी गेल्याचेही डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. रूग्णालयात ६५ आयसीयू बेड असून त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर सज्ज बेड आहेत. 

साई प्लॅटनियम रूग्णालयात कोरोना चाचणी लॅब असून कोरोना रुग्ण सोबत इतर रुग्णावर उपचार करून शस्त्रक्रिया केली जाते. इतर शासकीय व खाजगी लॅब मध्ये नाक व घस्यातून स्वाब घेतला जातो. मात्र आम्ही फफुसात नळी घालून स्वाब घेतो. त्यामुळे निश्चित निदान होत असल्याचे डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. गोर गरीब व गरजू नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय राजकारण त्याला आड आल्याने तूर्तास योजना स्थगित ठेवली. असे असलीतरी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्याचे संकेत डॉ पॉल यांनी दिले. तर दुसरीकडे भाजप व मनसेने रुग्णालयाच्या प्रशासन व कार्यपद्धतीवर आरोप करून कारवाईची मागणी केली आहे.

साई प्लॅटनियम रुग्णालयामुळे कोरोना रुग्णांना दिलासा-

शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना, साई प्लॅटनियम रुग्णालयाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. त्यामूळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळून असंख्य जनाचे जीव वाचल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. तर शिवसेनेचे श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्ष वंगाळ राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाMNSमनसे