शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

साई प्लेटेनियम रूग्णालय प्रकरणी; शिवसेना विरूद्ध भाजपा - मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:39 IST

शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांची धडपळ

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी कोविड साई प्लॅटीनियम रूग्णालया विरोधात विरोधकानी बागुलबुवा रंगविण्याचा आरोप महापौर लीलाबाई अशान यांनी केला. ऐण कोरोना महामारीत साई प्लॉटिनियम एकमेव कोविड रुग्णालय उभे राहिल्याने असंख्य जणाचा जीव वाचविल्यांची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णासाठी शहरात एकमेव कोविड साई प्लॅटनियम रुग्णालय उभारण्यात आले. रुग्णालयातील सर्वच बेड ऑक्सीजन युक्त करण्यासाठी महापालिकेने १८ लाख खर्च केल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्या वरून वाद निर्माण झाला. सुरवातीला मनसे यांनी रुग्णालय विरोधात आवाज उठविल्यानंतर आता भाजपही विरोधात उभी ठाकली. कोरोना संशयित व कोरोना रुग्णावर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय भित होते. अशावेळी साई प्लॅटनियम रुग्णालय, कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी पुढे आल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ पॉल यांनी दिली. गेल्या दोन अद्दिच महिन्यात ७०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णावर उपचार केले असून ते ठणठणीत घरी गेल्याचेही डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. रूग्णालयात ६५ आयसीयू बेड असून त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर सज्ज बेड आहेत. 

साई प्लॅटनियम रूग्णालयात कोरोना चाचणी लॅब असून कोरोना रुग्ण सोबत इतर रुग्णावर उपचार करून शस्त्रक्रिया केली जाते. इतर शासकीय व खाजगी लॅब मध्ये नाक व घस्यातून स्वाब घेतला जातो. मात्र आम्ही फफुसात नळी घालून स्वाब घेतो. त्यामुळे निश्चित निदान होत असल्याचे डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. गोर गरीब व गरजू नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय राजकारण त्याला आड आल्याने तूर्तास योजना स्थगित ठेवली. असे असलीतरी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्याचे संकेत डॉ पॉल यांनी दिले. तर दुसरीकडे भाजप व मनसेने रुग्णालयाच्या प्रशासन व कार्यपद्धतीवर आरोप करून कारवाईची मागणी केली आहे.

साई प्लॅटनियम रुग्णालयामुळे कोरोना रुग्णांना दिलासा-

शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना, साई प्लॅटनियम रुग्णालयाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. त्यामूळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळून असंख्य जनाचे जीव वाचल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. तर शिवसेनेचे श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्ष वंगाळ राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाMNSमनसे