शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सह्याद्री प्रतिष्ठानने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात साजरा केला ठाणे मुक्ती दिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:36 IST

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि प्रतिष्ठानचे महाराष्ट्र् राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थिती *"ठाणे मुक्ती दिन" हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृहात आज साजरा केला. यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे उपस्थित होते. 

ठळक मुद्दे कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे उपस्थित

ठाणे  : सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा  आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.   

           या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार व महाराष्ट्र् शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, सहयाद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, महाराष्ट्र् शाषनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य व देशातील ज्यांनी १५०० किल्ले पाहण्याचा विश्वविक्रम केला ते श्रमिक गोजमगुंडे, जेष्ठ इतिहासकार सदाशिव टेटविलकर, ठाणे कारागृहाच्या मुख्य अधिकारी नितीन वायचाळ, नगरसेविका प्रतिभा मढवी, माजी उपमहापौर अशोक भोईर, डॉ. राजेश मढवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, उपाध्यक्ष ऍड. अमित पाटील, स्वप्नाली साळवी, योगेश बोरसे व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

 

सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीने व कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेली तीन वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात पार पडत असतो. या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर नागरिक उपस्थित असतात. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यक्रमाची माहिती देऊन या मध्यवर्ती कारागृहात म्युरल चित्रांच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारणार असल्याचीही माहिती दिली व  आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तर पांडुरंग बलकवडे व सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम कसा घडला याबद्दल उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे दिवा शहर अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंगMumbaiमुंबई