शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री प्रतिष्ठानने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात साजरा केला ठाणे मुक्ती दिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:36 IST

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि प्रतिष्ठानचे महाराष्ट्र् राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थिती *"ठाणे मुक्ती दिन" हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृहात आज साजरा केला. यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे उपस्थित होते. 

ठळक मुद्दे कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे उपस्थित

ठाणे  : सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा  आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.   

           या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार व महाराष्ट्र् शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, सहयाद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, महाराष्ट्र् शाषनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य व देशातील ज्यांनी १५०० किल्ले पाहण्याचा विश्वविक्रम केला ते श्रमिक गोजमगुंडे, जेष्ठ इतिहासकार सदाशिव टेटविलकर, ठाणे कारागृहाच्या मुख्य अधिकारी नितीन वायचाळ, नगरसेविका प्रतिभा मढवी, माजी उपमहापौर अशोक भोईर, डॉ. राजेश मढवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, उपाध्यक्ष ऍड. अमित पाटील, स्वप्नाली साळवी, योगेश बोरसे व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

 

सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीने व कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेली तीन वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात पार पडत असतो. या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर नागरिक उपस्थित असतात. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यक्रमाची माहिती देऊन या मध्यवर्ती कारागृहात म्युरल चित्रांच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारणार असल्याचीही माहिती दिली व  आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तर पांडुरंग बलकवडे व सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम कसा घडला याबद्दल उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे दिवा शहर अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंगMumbaiमुंबई