शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सह्याद्री प्रतिष्ठानने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात साजरा केला ठाणे मुक्ती दिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:36 IST

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि प्रतिष्ठानचे महाराष्ट्र् राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थिती *"ठाणे मुक्ती दिन" हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृहात आज साजरा केला. यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे उपस्थित होते. 

ठळक मुद्दे कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे उपस्थित

ठाणे  : सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा  आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.   

           या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार व महाराष्ट्र् शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, सहयाद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, महाराष्ट्र् शाषनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य व देशातील ज्यांनी १५०० किल्ले पाहण्याचा विश्वविक्रम केला ते श्रमिक गोजमगुंडे, जेष्ठ इतिहासकार सदाशिव टेटविलकर, ठाणे कारागृहाच्या मुख्य अधिकारी नितीन वायचाळ, नगरसेविका प्रतिभा मढवी, माजी उपमहापौर अशोक भोईर, डॉ. राजेश मढवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, उपाध्यक्ष ऍड. अमित पाटील, स्वप्नाली साळवी, योगेश बोरसे व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

 

सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीने व कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेली तीन वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात पार पडत असतो. या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर नागरिक उपस्थित असतात. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यक्रमाची माहिती देऊन या मध्यवर्ती कारागृहात म्युरल चित्रांच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारणार असल्याचीही माहिती दिली व  आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तर पांडुरंग बलकवडे व सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम कसा घडला याबद्दल उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे दिवा शहर अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंगMumbaiमुंबई