शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घर नव्हते तेव्हा साहित्य संघाने आधार दिला-जयंत सावरकर

By admin | Updated: May 9, 2017 00:51 IST

मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही अशी कृतज्ञता ज्येष्ठ नाट्यकलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी साहित्य संघ आणि दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दामू केंकरे स्मृती नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, दि गोवा हिंदू असोसिएशनच्या वतीने श्रीपाद काबाडी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तर साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी साहित्य संघांचे आणि जयंत सावरकर यांचे नाते किती जिव्हाळ््याचे आहे, हे सांगितले. सावरकर पूर्वी नाटकांसाठी प्रॉम्प्टर म्हणून काम करत असत आणि हे प्रॉम्प्टरचे काम किती कठीण असते हे देखील त्यांनी सांगितले.साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ.बाळ भालेराव यांच्या हस्ते जयंत सावरकर यांचा शाल, श्रीफळ आणि फळांची परडी देऊन सत्कार करण्यात आला. किर्ती शिलेदार यांच्या स्वयंवरच्या पहिल्या प्रयोगात भूमिका करणारा एक कलावंत येऊ शकणार नव्हता आणि त्यामुळे एका दिवसात काम कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता, ते काम मी केले आणि साहित्य संघात झालेला तो पहिला प्रयोग हा कायम स्मरणात राहिल असेही सावरकर यांनी सांगितले. विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक आणि आगरकर’ , ‘वाजे पाऊल आपले’ या नाटकांच्या आठवणींनाही सावरकरांनी उजाळा दिला. त्याचप्रमाणे, साहित्य संघाने पुन्हा एकदा ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचा प्रयोग निर्माण करावा आणि त्यात आपण काम करण्यास तयार आहोत, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन कार्यक्रमानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचा कार्यक्रम सादर झाला.