शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

घर नव्हते तेव्हा साहित्य संघाने आधार दिला-जयंत सावरकर

By admin | Updated: May 9, 2017 00:51 IST

मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही अशी कृतज्ञता ज्येष्ठ नाट्यकलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी साहित्य संघ आणि दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दामू केंकरे स्मृती नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, दि गोवा हिंदू असोसिएशनच्या वतीने श्रीपाद काबाडी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तर साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी साहित्य संघांचे आणि जयंत सावरकर यांचे नाते किती जिव्हाळ््याचे आहे, हे सांगितले. सावरकर पूर्वी नाटकांसाठी प्रॉम्प्टर म्हणून काम करत असत आणि हे प्रॉम्प्टरचे काम किती कठीण असते हे देखील त्यांनी सांगितले.साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ.बाळ भालेराव यांच्या हस्ते जयंत सावरकर यांचा शाल, श्रीफळ आणि फळांची परडी देऊन सत्कार करण्यात आला. किर्ती शिलेदार यांच्या स्वयंवरच्या पहिल्या प्रयोगात भूमिका करणारा एक कलावंत येऊ शकणार नव्हता आणि त्यामुळे एका दिवसात काम कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता, ते काम मी केले आणि साहित्य संघात झालेला तो पहिला प्रयोग हा कायम स्मरणात राहिल असेही सावरकर यांनी सांगितले. विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक आणि आगरकर’ , ‘वाजे पाऊल आपले’ या नाटकांच्या आठवणींनाही सावरकरांनी उजाळा दिला. त्याचप्रमाणे, साहित्य संघाने पुन्हा एकदा ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचा प्रयोग निर्माण करावा आणि त्यात आपण काम करण्यास तयार आहोत, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन कार्यक्रमानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचा कार्यक्रम सादर झाला.