शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गोरगरिबांसाठी सागर उटवाल ठरले अन्नदाता; उल्हासनगरात सुरू आहे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 15:19 IST

सकाळ, संध्याकाळ ताजे अन्न

सदानंद नाईकउल्हासनगर : ऐन कोरोनाकाळात शिवसेना शहर संघटक सागर उटवाल यांच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम टीम शेकडो गरीब-गरजूंची भूक भागवित आहे. बिर्यानी, डाळ-भात, पोळी, खिचडी आदींचे वाटप ही टीम करीत आहे.

उल्हासनगरात संकटकाळी अनेक समाजसेवी संस्था पुढे येत आहेत. यावर्षी कोणताही गाजावाजा न करता समाजसेवी संस्था आपली कामे करीत आहेत. त्यापैकी शिवसेना शहर संघटक व पक्षाचे कल्याण लोकसभा सोशल मीडिया प्रमुख उटवाल हे आहेत. उटवाल यांची टीम हजारो गरिबांना पाकिटातून अन्नाचे वाटप करत आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरातील चूल कशी पेटणार अशी चिंता शेकडो नागरिकांना लागली आहे. अशांच्या मदतीला ही टीम धावत आली आहे.

टीममधील राज उटवाल, सुनील सिंह, राहुल तिवारी, राहुल गुदारिया, अमित राजोरीया, साजन मारोठीया, राहुल वर्मा, जोगिंदर सिंग आदींनी एकत्र येत शहराच्या पश्चिम भागातील सी ब्लॉक परिसरातील शेकडो गरीब व गरजू नागरिकांना दोन वेळचे ताजे अन्न देत आहेत. टीमचे सदस्य स्वतः स्वयंपाक करून पाकिटे गरिबांपर्यंत पोहचवतात. टीमला जितके दिवस शक्य आहे तितके दिवस हा उपक्रम राबविणार असल्याचे उटवाल यांनी सांगितले. अशा संकटसमयी समाजसेवी संस्था व दानशूर नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर