शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१६०० हेक्टर कांदळवनाच्या सुरक्षेचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: February 25, 2017 23:23 IST

त्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच

- सुरेश लोखंडे, ठाणेत्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील अन्यही ठिकाणचे कांदळवन वाळूमाफिया आणि बिल्डर लॉबीने नष्ट केले आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्यास विलंब होत आहे. एवढेच नव्हे, तर भिवंडी व ठाणे तालुक्यातील सुमारे १६०० हेक्टर कांदळवन संरक्षित करण्याच्या प्रतीक्षेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.ठाणे खाडी, मुंब्रा रेती बंदर, दिवा खाडीकिनारचे कांदळवन तर पूर्णपणे नष्ट झाले आहे. आंजूर, दिवे येथील कांदळवनावर भराव टाकून ती नष्ट केल्याचा विषय तर डीपीसीच्या बैठकीतही चर्चेला आला आहे. ‘वाळूमाफिया व बिल्डर्स यांनी खाडीकिनारे नष्ट करायला घेतले आहेत,’ असे दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीच उघड केले आहे. ती वाचवण्यासाठी कांदळवनांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र ते हवेत विरले आहे. भिवंडी तालुक्यातील कांदळवनाची व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवनव्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर आहे. ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढणे अपेक्षित आहे. हा सुमारे एक हजार ६१८ हेक्टरवरील कांदळवन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव अद्याप धूळखात आहे. शासकीय जमिनीवरील कांदळवनपट्टे वेळीच वन विभागाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. मात्र, ते अद्याप फायलीच्या चक्र व्यूहात अडकलेले आहे. कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मीरा-भार्इंदर भागातील कांदळवनाच्या जागेवर भराव टाकण्यात आलेला आहे. कनकिया नगर, तिवारी कॉलेज रोड, शिवनेरी नगर या परिसरात बांधकामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिल्यानंतर १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कांदळवनाच्या ५० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम झाले नसावे, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. तरीदेखील भराव टाकण्याची परवानगी कशी दिली, असे विचारून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याण यांनी महापालिकेला धारेवर धरलेले आहे. कांदळवनाच्या जागांवर कचरा टाकण्यास विरोध आहे. तरीदेखील दिवा येथे खाडी किनाऱ्याजवळ डम्पिंग आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखलकांदळवन सुरक्षेची बाब लोकमतने वेळोवळी प्रसिद्ध केली आहे. यास अनुसरून एक जनहित याचिकादेखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत प्रशासनावर ताशेरे ओढून २ मार्चच्या सुनावणीला जिल्हाधिकारी, ठाणे मनपा आयुक्त आणि वनाधिकारी यांना हजर होण्यास सांगितले आहे. याआधीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झाली आहे. विभागीय महसूल आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या बैठकीद्वारे वन संरक्षणाचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या वनांच्या संरक्षणासाठी खास ठोस उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाहीनवी मुंबई परिसरातील ऐरोली ते बेलापूर या परिसरात सुमारे १४७५ हेक्टरवर कांदळवन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. ही प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धदेखील झाली आहे. त्यामध्ये वाशी, तळवळी, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार (नवी मुंबई) शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली परिसरातील कांदळवनाचा समावेश करण्यात आला आहे.