शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
3
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
4
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
5
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
7
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
8
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
9
ऐश्वर्या रायने लेक आराध्यासह घेतलं जीएसबीचं दर्शन, नेटकरी कमेंट्स करत म्हणाले...
10
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
11
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
12
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
13
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
14
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
15
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
16
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
17
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
18
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
19
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
20
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?

१६०० हेक्टर कांदळवनाच्या सुरक्षेचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: February 25, 2017 23:23 IST

त्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच

- सुरेश लोखंडे, ठाणेत्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील अन्यही ठिकाणचे कांदळवन वाळूमाफिया आणि बिल्डर लॉबीने नष्ट केले आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्यास विलंब होत आहे. एवढेच नव्हे, तर भिवंडी व ठाणे तालुक्यातील सुमारे १६०० हेक्टर कांदळवन संरक्षित करण्याच्या प्रतीक्षेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.ठाणे खाडी, मुंब्रा रेती बंदर, दिवा खाडीकिनारचे कांदळवन तर पूर्णपणे नष्ट झाले आहे. आंजूर, दिवे येथील कांदळवनावर भराव टाकून ती नष्ट केल्याचा विषय तर डीपीसीच्या बैठकीतही चर्चेला आला आहे. ‘वाळूमाफिया व बिल्डर्स यांनी खाडीकिनारे नष्ट करायला घेतले आहेत,’ असे दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीच उघड केले आहे. ती वाचवण्यासाठी कांदळवनांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र ते हवेत विरले आहे. भिवंडी तालुक्यातील कांदळवनाची व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवनव्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर आहे. ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढणे अपेक्षित आहे. हा सुमारे एक हजार ६१८ हेक्टरवरील कांदळवन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव अद्याप धूळखात आहे. शासकीय जमिनीवरील कांदळवनपट्टे वेळीच वन विभागाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. मात्र, ते अद्याप फायलीच्या चक्र व्यूहात अडकलेले आहे. कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मीरा-भार्इंदर भागातील कांदळवनाच्या जागेवर भराव टाकण्यात आलेला आहे. कनकिया नगर, तिवारी कॉलेज रोड, शिवनेरी नगर या परिसरात बांधकामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिल्यानंतर १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कांदळवनाच्या ५० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम झाले नसावे, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. तरीदेखील भराव टाकण्याची परवानगी कशी दिली, असे विचारून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याण यांनी महापालिकेला धारेवर धरलेले आहे. कांदळवनाच्या जागांवर कचरा टाकण्यास विरोध आहे. तरीदेखील दिवा येथे खाडी किनाऱ्याजवळ डम्पिंग आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखलकांदळवन सुरक्षेची बाब लोकमतने वेळोवळी प्रसिद्ध केली आहे. यास अनुसरून एक जनहित याचिकादेखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत प्रशासनावर ताशेरे ओढून २ मार्चच्या सुनावणीला जिल्हाधिकारी, ठाणे मनपा आयुक्त आणि वनाधिकारी यांना हजर होण्यास सांगितले आहे. याआधीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झाली आहे. विभागीय महसूल आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या बैठकीद्वारे वन संरक्षणाचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या वनांच्या संरक्षणासाठी खास ठोस उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाहीनवी मुंबई परिसरातील ऐरोली ते बेलापूर या परिसरात सुमारे १४७५ हेक्टरवर कांदळवन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. ही प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धदेखील झाली आहे. त्यामध्ये वाशी, तळवळी, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार (नवी मुंबई) शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली परिसरातील कांदळवनाचा समावेश करण्यात आला आहे.