शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मीरा-भाईंदर : वेळेवर वेतन मिळण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:16 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सुमारे २२०० कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक कामबंद आंदोलन सुरु केले.

मीरा : मीरा-भार्इंदर महापालिकेतील सुमारे २२०० कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. यामुळे शहरात कच-याचे साम्राज्य पसरल्याने बिथरलेल्या प्रशासनाकडून कामगारांना त्वरीत वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी काही वेळेतच आंदोलन मागे घेतले. 

पालिकेतील कामगारांना वेतन देण्यासाठी कंत्राटदार नेहमीच दिरंगाई करीत असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. करारानुसार कंत्राटदारांनी प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान कामगारांना वेतन देणे अपेक्षित असतानाही त्या कालावधीत वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा आर्थिक ताळेबंद कोलमडून पडतो. काही वेळेस तर वेतनाचा महिना उलटून गेल्यानंतरही वेतन अदा केले जात नाही. त्यामुळे कामगारांना संघटनेकडे सतत तक्रारी कराव्या लागतात. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना घेराव घालून वेतन मिळवितात.

पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरु होतो. गेल्या महिन्यांत देखील उद्यान विभागातील सुमारे २५० कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन न दिल्याने त्यांनी पालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी प्रशासनाने त्वरीत वेतन देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यंदाही फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्याप कामगारांना अदा न केल्याने अखेर कामगारांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे शहरभर कचरा न उचलल्याने तो साठू लागला. त्याची माहिती मिळताच उपायुक्तांनी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलिप गोतारणे, पदाधिकारी मंगेश पाटील, रत्नाकर पाटील, जयश्री पाटील यांना पाचारण करुन कामगारांना आजच वेतन देण्याची व्यवस्था करीत असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी काही वेळेतच आंदोलन मागे घेतल्याचे जाहिर केले. 

भाजपा सत्ताधाऱ्यांच्या खाबूगिरीमुळे पालिकेची दिवाळखोरी

सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरात कच-याचे साम्राज्य पसरल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक फरीद कुरेशी यांनी पालिका आयुक्त बळीराम पवार यांना लेखी तक्रार करुन त्वरीत कचरा उचलण्याची विनंती केली. कुरेशी यांनी कामगार वेतनासाठी पालिकेच्या आर्थिक दिवाळखोरीला केवळ भाजपा सत्ताधारीच कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. सत्ताधा-यांच्या वाढत्या टक्केवारीमुळे शहरातील विकासाचे तीनतेरा वाजले असतानाच पालिकेच्या तिजोरीवर विकासकामांच्या नावाखाली हात मारला जात आहे. या खाबूगिरीच्या प्रवृत्तीला त्वरीत चाप लावण्याची तत्परता दाखविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.