शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मीरा-भाईंदर : वेळेवर वेतन मिळण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:16 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सुमारे २२०० कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक कामबंद आंदोलन सुरु केले.

मीरा : मीरा-भार्इंदर महापालिकेतील सुमारे २२०० कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. यामुळे शहरात कच-याचे साम्राज्य पसरल्याने बिथरलेल्या प्रशासनाकडून कामगारांना त्वरीत वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी काही वेळेतच आंदोलन मागे घेतले. 

पालिकेतील कामगारांना वेतन देण्यासाठी कंत्राटदार नेहमीच दिरंगाई करीत असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. करारानुसार कंत्राटदारांनी प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान कामगारांना वेतन देणे अपेक्षित असतानाही त्या कालावधीत वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा आर्थिक ताळेबंद कोलमडून पडतो. काही वेळेस तर वेतनाचा महिना उलटून गेल्यानंतरही वेतन अदा केले जात नाही. त्यामुळे कामगारांना संघटनेकडे सतत तक्रारी कराव्या लागतात. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना घेराव घालून वेतन मिळवितात.

पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरु होतो. गेल्या महिन्यांत देखील उद्यान विभागातील सुमारे २५० कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन न दिल्याने त्यांनी पालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी प्रशासनाने त्वरीत वेतन देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यंदाही फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्याप कामगारांना अदा न केल्याने अखेर कामगारांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे शहरभर कचरा न उचलल्याने तो साठू लागला. त्याची माहिती मिळताच उपायुक्तांनी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलिप गोतारणे, पदाधिकारी मंगेश पाटील, रत्नाकर पाटील, जयश्री पाटील यांना पाचारण करुन कामगारांना आजच वेतन देण्याची व्यवस्था करीत असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी काही वेळेतच आंदोलन मागे घेतल्याचे जाहिर केले. 

भाजपा सत्ताधाऱ्यांच्या खाबूगिरीमुळे पालिकेची दिवाळखोरी

सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरात कच-याचे साम्राज्य पसरल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक फरीद कुरेशी यांनी पालिका आयुक्त बळीराम पवार यांना लेखी तक्रार करुन त्वरीत कचरा उचलण्याची विनंती केली. कुरेशी यांनी कामगार वेतनासाठी पालिकेच्या आर्थिक दिवाळखोरीला केवळ भाजपा सत्ताधारीच कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. सत्ताधा-यांच्या वाढत्या टक्केवारीमुळे शहरातील विकासाचे तीनतेरा वाजले असतानाच पालिकेच्या तिजोरीवर विकासकामांच्या नावाखाली हात मारला जात आहे. या खाबूगिरीच्या प्रवृत्तीला त्वरीत चाप लावण्याची तत्परता दाखविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.