शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग झोळीमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

ठाणे : जन्मलेल्या नवजात बाळाला कपड्यात घट्ट गुंडाळून झोळीत झोपविल्याने बाळ चांगले बाळसे धरते, असे बोलले जाते. मात्र, दुसरीकडे ...

ठाणे : जन्मलेल्या नवजात बाळाला कपड्यात घट्ट गुंडाळून झोळीत झोपविल्याने बाळ चांगले बाळसे धरते, असे बोलले जाते. मात्र, दुसरीकडे याच झोळीमुळे बालकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावू लागल्या असून कुपोषणाच्या संख्येतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामीण भाग झोळीमुक्त करण्याच्या दृष्टीने अनोखा उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागातील नागरिक आजही जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्या विळख्यात अडकलेले आहे. त्यात, या भागातील नागरिकांचे रोजगारासाठी आजही स्थलांतर सुरू आहे. त्यातून अनेकदा नवजात बालकांसह लहानग्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तसेच बालसंगोपनाच्या पारंपरिक पद्धतीमुळे बालकांच्या सुरुवातीच्या कालावधीतच त्यांच्या वाढ होण्यावर मर्यादा येतात. त्यातून यामुळे कुपोषणासारखी समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. तसेच बालकांचा आहार, स्वच्छता आणि सुरुवातीच्या काळातील सुरक्षितता याविषयी पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग नेहमीच कार्यरत असतात.

झोळीमुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास

ग्रामीण भागात आजही जन्मलेल्या बालकांना झोपवण्यासाठी घरात साडीपासून झोळी तयार केली जाते. परंतु, तिची रचना पाहिल्यास यात पुरेशी खेळती हवा उपलब्ध होत नसल्यामुळे बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो, बालकांच्या हालचालींवर मर्यादा येतात. त्याचबरोबर, बालकाला जास्त वेळ झोळीत ठेवल्यावर त्याची वाढ खुंटते अशा विविध आरोग्यविषयक समस्या बालकांमध्ये दिसून येतात. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकांची संख्या आढळून येते.

बाहेर ठेवल्यास प्राणिदंशाची भीती

बाळाला झोळीतून काढून जमिनीवर ठेवल्यामुळे अज्ञात प्राणिदंश किंवा सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कुपोषित बालकांचे आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ग्रामीण भागात बालकांच्या विकासासाठी विशेष सुविधा तसेच पालकांना बालसंगोपनाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बालकांच्या वाढीसाठी तसेच त्यांचा विकास योग्यप्रकारे होण्यासह सर्पदंश किंवा अज्ञात प्राणिदंशामुळे होणाऱ्या बालमृत्यूंवर आळा बसावा, यासाठी ज्या घरात लहान बाळ असेल, त्याच्या कुटुंबांना पाळणा, कांगारू मदर केअर आणि इतर गरजेच्या वस्तू या झोळीमुक्ती मोहिमेंतर्गत देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग झोळीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

.......

बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, बालसंगोपनातील चुकीच्या पद्धतींना आळा घालणे या उद्देशाने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येत असून निश्चितपणे कुपोषणमुक्ती व बालमृत्यू प्रतिबंध या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपक्रमाचा निश्चित फायदा होईल.

संतोष भोसले, महिला व बालविकास अधिकारी, जि.प. ठाणे