शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 01:35 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते.

ठाणेठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु, अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीचा निकाल लागून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत रंगत वाढवण्यासाठी शिवसेनेकडून केवळ एकमेव उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. तर, राष्टÑवादीने मतदानाच्या शेवटच्या दिवसांच्या सत्रात शरद पवार आणि जयंत पाटील यांची सभा घेतली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाली, तर शरद पवार आणि पाटील यांच्या सभांचा मात्र काहीच परिणाम ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर झाला नसल्याचे दिसून आले.ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्टÑवादीतर्फे आनंद परांजपे यांना अनपेक्षितपणे या निवडणुकीत उतरवण्यात आले. तर, शिवसेनेने राजन विचारे यांच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर प्रचार काळात २१ एप्रिल रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. तिला पोहोचण्यास ठाकरे यांना उशीर झाला होता. तसेच या सभेला म्हणावी तितकी गर्दीसुद्धा झाली नव्हती. त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबत मात्र चिंता व्यक्त केली जात होती.परंतु, या सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका करतानाच, राज्य सरकारवरही आसूड ओढले होते. शिवाय, पुलवामा हल्ला आणि इतर मुद्यांनासुद्धा त्यांनी हात लावला होता. परंतु, त्यांच्या सभेचा काहीच परिणाम न झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यासुद्धा ठाण्यात तळ ठोकून होत्या. परंतु, त्यांचासुद्धा प्रभाव पडला नसल्याचे निकालात दिसून आले.ठाकरेंची सभाउद्धव ठाकरे यांनी केवळ १० मिनिटांचेच भाषण केले. या भाषणात त्यांनी युतीवर भाष्य करताना, काँग्रेस, राष्टÑवादीवर भरपूर टीका केली होती. तसेच युतीच्या काळात जी काही विकासकामे केली, त्यांची माहिती भाषणातून दिली होती.पवारांची सभाशरद पवार यांची सभा चांगलीच गाजेल आणि त्याचा मतदानावर आणखी चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. त्यानुसार, प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ठाण्यात सभा झाली.राज ठाकरेंची सभामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घ्यावी याकरिता मनसैनिकांनी प्रयत्न केले. ते असफल ठरले. मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाण्यात आले व त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पत्रकारांना ते सामोरे गेले नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालthane-pcठाणे