शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बालयोगी सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 01:20 IST

ठाणे जिल्ह्याच्या वसई, भिवंडी तालुक्यांमध्ये पसरलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाने वनजमिनीवर अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

मुंबई : ठाणे जिल्ह्याच्या वसई, भिवंडी तालुक्यांमध्ये पसरलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाने वनजमिनीवर अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.पर्यावरणवादी कार्यकर्ते देबी गोएंका यांच्या ‘कॉन्झर्व्हेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ने केलेल्या अर्जावर न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने असा आदेश दिला की, राज्य सरकारने बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम पाडून टाकण्याची कायदेशीर कारवाई राज्य सरकारने करावी व त्याचा अहवाल सुनावणीच्या पुढील तारखेस द्यावा. कारवाईसाठी आठ आठवड्यांची मुदत दिली असून पुढील सुनावणी २२ जुलैला आहे.वनजमिनींवरील अतिक्रमणे, वनांचा वनेतर कामांसाठी होणारा वापर याविषयी १९९५ मध्ये दाखल टी.एन. गोदावर्दन थिरुमुलपाड ही मूळ याचिका प्रलंबित ठेवून न्यायालय देशभरातून याविषयी वेळोवेळी केल्या जाणाऱ्या अर्जांची सुनावणी करत असते. देबी गोएंका यांनी केलेल्या तशाच एका अर्जावर हा आदेश दिला.न्यायालयाने नेमलेल्या ‘केंद्रीय उच्चाधिकार समिती’कडे गोएंका यांच्या बॉम्बे एन्व्हायर्नमेटल अ‍ॅक्शन ग्रुप’ने या आश्रमाविरुद्ध सन २००३ मध्ये तक्रार केली होती. समितीने सन २००८ मध्ये दिलेल्या अहवालात असा निष्कर्ष काढला की, वनसंरक्षण कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून आश्रमाने ३० वर्षांत तुंगारेश्वर अभयारण्यात पाय रोवला. अनेक बेकायदा कामे केली. आश्रम अभयारण्यातून बाहेर हलवावा, असेही समितीने सुचविले. केंद्रीय समितीने म्हटले होते की, अभयारण्यात आश्रम हातपाय पसरत असताना सरकारी अधिकाऱ्यांनी नोटिसा काढण्याखेरीज कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. आश्रमाने भोजनालय, औषधालय, सभामंडप, मंदिर असलेले दोन मजली बांधकाम वनजमिनीवर केल्याचेही समितीने म्हटले.आश्रमाच्या वकिलांची विनंती न्यायालयाकडून अमान्यसमितीच्या या अहवालाचा दाखला देत गोएंका यांच्या या अर्जात आश्रम अभयारण्याबाहेर काढणे ही मुख्य मागणी आहे. त्याचा अंतरिम टप्पा म्हणून आताचा पाडकामाचा आदेश दिला गेला आहे. थेट आश्रमात जाण्यासाठी नियम मोडून रस्ता बांधण्यात आला आहे, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. आश्रमाच्या वकिलाने सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. मात्र ती मान्य झाली नाही. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले की, राज्य वन्यजीव मंडळानेही आश्रमाच्या अनधिकृत बांधकामांची दखल घेऊन ती पाडून टाकण्याची गरज नमूद केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय