शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सत्ताधारी शिवसेना झाली दिशाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:58 IST

केडीएमसीत सत्ता असताना फेरीवाला अतिक्रमणाविरोधात रस्त्यावर उतरणे असो, अथवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ज्येष्ठ नगरसेवकाचा राजीनामा प्रकरण असो, यावर मंगळवारच्या शिवसेना नगरसेवकांच्या आंदोलनाने कढी केली आहे.

प्रशांत माने।कल्याण : केडीएमसीत सत्ता असताना फेरीवाला अतिक्रमणाविरोधात रस्त्यावर उतरणे असो, अथवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ज्येष्ठ नगरसेवकाचा राजीनामा प्रकरण असो, यावर मंगळवारच्या शिवसेना नगरसेवकांच्या आंदोलनाने कढी केली आहे. सत्ताधा-यांनी अचानक पुकारलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, जिल्हा नेतृत्वाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने ही नामुश्कीची परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. नगरसेवकांना त्यांचा धाकही न राहिल्याने पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील दुरावा वाढत आहे. गटातटांच्या राजकारणात पक्षाचे नुकसान होत असल्याची खंत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.केडीएमसीतील शिवसेना-भाजपा युतीतील शहकाटशहाचे राजकारण शहरांच्या विकासाला मारक ठरत आहे. असे असताना शिवसेनेला प्रशासनाविरोधात वारंवार आंदोलने छेडावी लागत आहेत, ही सत्ताधारी म्हणून शरमेची बाब आहे. एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे आंदोलनांद्वारे विरोधकांचे कामही बजावायचे, ही दुटप्पी भूमिका सध्या केडीएमसीत सत्तेत असलेल्या शिवसेनेबाबतीत पाहावयास मिळत आहे. मे २०१८ मध्ये महापौरपदाची निवडणूक होणार आहे. पुढील अडीच वर्षे महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या कालावधीसाठी काही जण महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे महासभेत प्रश्न उपस्थित करून अडचणीत आणण्याचे प्रकार असो, अथवा छेडली जाणारी आंदोलने, यात महापौर राजेंद्र देवळेकर यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारचे आंदोलन त्याचाच एक भाग होता का, अशीही चर्चा सुरू आहे. पदांची लालसा असलेल्या महत्त्वाकांक्षी नगरसेवकांकडून याची जबाबदारी झटकली जात असली तरी गटातटांच्या राजकारणात सत्ताधाºयांचे प्रमुख म्हणून महापौरांच्याच पदाला धक्का बसत असल्याचा मुद्दा नाकारून चालणार नाही.आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात प्रामुख्याने नगरसेविकांची भूमिका अग्रस्थानी होती. गोल्डन गँगमुळे आमची विकासकामे होत नाहीत, असा सूर त्यांनी जुलैत झालेल्या विधिमंडळाच्या महिला आमदारांच्या समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आळवला होता. मग, अचानक मंगळवारी आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधातील आंदोलन संशयाच्या भोवºयात सापडले आहे. काहींनी आपली पोळी भाजण्यासाठी नगरसेविकांना पुढे केल्याचीही चर्चा आहे. या त्यांच्या कृत्याने सत्ताधारी म्हणून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे.डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात शिवसेनेच्या युवा संघटनेचे आंदोलन असो, अथवा पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांचे बेमुदत उपोषण आणि भ्रष्टाचाराविरोधात दिलेला राजीनामा प्रकरण असो, यात सत्ताधाºयांचे प्रमुख म्हणून देवळेकर यांना वेळोवेळी तोंडघशी पडावे लागले. याकडे जिल्हा नेतृत्वाचे दुर्लक्ष झाल्याने वारंवार अशा घटना घडतच आहेत, हे नाकारून चालणार नाही.जिल्हाप्रमुख म्हणून गोपाळ लांडगे यांच्यावर धुरा आहे. परंतु, त्यांना कोणीही जुमानत नसल्याची वस्तुस्थिती आहे, तर जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे हे मंत्री झाल्यापासून त्यांचाही कल्याण-डोंबिवलीत घडणाºया कृत्यांकडे पुरता कानाडोळा झाल्याची चर्चा आहे. याआधी कल्याण महापालिकेतील अंतर्गत घटना असो अथवा सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार असो, लागलीच याची दखल शिंदे यांच्याकडून घेतली जायची. वेळप्रसंगी संबंधित नगरसेवक तसेच पदाधिकाºयांची कानउघाडणी केली जायची. परंतु, आता तसे घडत नाही. याचा परिणाम म्हणून सत्ताधारी दिशाहीन झाल्याचे चित्र आहे.