शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

अस्वच्छ खाद्यपदार्थांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:48 IST

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये अवघ्या १५ दिवसात वडापावमध्ये पाल आढळल्याच्या दोन घटना घडल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेचा विचार केल्यास शहरातील अनेक वडापाव सेंटर आणि खाद्यपदार्थ विकणारी दुकाने नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य नागररिकांच्या आवाक्यातील वस्तू हातगाडीवरच मिळत असली, तरी तेथील किमान स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज या दोन्ही घटनांनी अधोरेखित केली आहे.अंबरनाथमधील बबन वडापाव सेंटरमधील वड्यात पाल आढळल्यानंतर, काही दिवसांतच बदलापूरातील खिडकी वडापाव सेंटरमध्ये वड्यात पाल आढळली. या दोन्ही घटनांनी उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा आणि त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. हातगाडीवर वडा पाव विकणे ही विक्रेत्यांची गरज आहे. यातून ग्राहकांचीही सोय होत असल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग या हातगाड्यांकडे बघून न बघितल्यासारखे करतो. हातगाड्यांवर जे खाद्यपदार्थ विकले जातात, त्या ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी केली असता, हे खाद्यपदार्थ नारिकांच्या आरोग्याला बाधण्याची शक्यता असल्याचे दिसते. बदलापूरातील स्टेशन परिसरात अनेकजण हातगाडीवर खाद्यपदार्थ विकतात. रस्त्यावरील धुळ असो वा आजुबाजुची अस्वच्छता, त्याचा काहीही परिणाम या हातगाडीचालकांवर होत नाहीत. नागरिकदेखील आरोग्याची पर्वा न करता या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. हातगाडीवरील खाद्यपदार्थ हे कमी पैशात भूक भागविण्याचे माध्यम झाले आहे. अनेकजण झटपट काहीतरी खाण्याच्या नादात या खाद्यपदार्थांवर तुटून पडतात. त्यामुळे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विकणाºयांची संख्या वाढत आहे.अंबरनाथ असो वा बदलापूर या दोन्ही ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. आजुबाजुचा परिसर नेहमीच अस्वच्छ असतानाही, त्याचठिकाणी खाद्यपदार्थ विकेल जातात. एवढेच नव्हे तर उतलेले खाद्यपदार्थ त्याचठिकाणी फेकून देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अंबरनाथ स्टेशन परिसरात सायंकाळी ७ नंतर चायनिज खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात येतात. या खाद्यपदार्थांतूनही धोका होण्याची शक्यता आहे. येथेही स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. ज्याठिकाणी हे खाद्यपदार्थ बनविले जातात त्याच ठिकाणी गटार असून तेथील माशांमुळे आरोग्यास अपाय होण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी लावण्यात येणाºया एलईडी दिव्यांवर उडणारी पाखरे खाद्यपदार्थात बरेचदा पडतात. त्यादृष्टीनेही येथे कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी झुरळांचा त्रास आहे. शहरात अनेक ठिकाणी स्नॅक्स कॉर्नरच्या नावावर दिवसागणीक हातगाड्यांची संख्या वाढत आहे. सध्या वड्यात पाल आढळल्याची चर्चा असली तरी भविष्यात यापेक्षाही घातक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नियमांची सर्रास पायमल्लीखाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रसासनाचा रितसर परवाना काढणे गरजेचे आहे. ते काढणे सोपे झाले आहे. मात्र कायदा धाब्यावर बसवून अनेक हातगाडीचालक बेधडकपणे खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत.शहरात अनेक हातगाड्यांनी नियम मोडलेले असले, तरी त्यांनी स्वच्छतेची चोख व्यवस्था केलेली आहे. मात्र काही दुकानदारांनी हे नियम धाब्यावर बसवून अस्वच्छ ठिकाणी आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे पालिकेने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्यbadlapurबदलापूर