शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

अस्वच्छ खाद्यपदार्थांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:48 IST

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये अवघ्या १५ दिवसात वडापावमध्ये पाल आढळल्याच्या दोन घटना घडल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेचा विचार केल्यास शहरातील अनेक वडापाव सेंटर आणि खाद्यपदार्थ विकणारी दुकाने नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य नागररिकांच्या आवाक्यातील वस्तू हातगाडीवरच मिळत असली, तरी तेथील किमान स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज या दोन्ही घटनांनी अधोरेखित केली आहे.अंबरनाथमधील बबन वडापाव सेंटरमधील वड्यात पाल आढळल्यानंतर, काही दिवसांतच बदलापूरातील खिडकी वडापाव सेंटरमध्ये वड्यात पाल आढळली. या दोन्ही घटनांनी उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा आणि त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. हातगाडीवर वडा पाव विकणे ही विक्रेत्यांची गरज आहे. यातून ग्राहकांचीही सोय होत असल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग या हातगाड्यांकडे बघून न बघितल्यासारखे करतो. हातगाड्यांवर जे खाद्यपदार्थ विकले जातात, त्या ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी केली असता, हे खाद्यपदार्थ नारिकांच्या आरोग्याला बाधण्याची शक्यता असल्याचे दिसते. बदलापूरातील स्टेशन परिसरात अनेकजण हातगाडीवर खाद्यपदार्थ विकतात. रस्त्यावरील धुळ असो वा आजुबाजुची अस्वच्छता, त्याचा काहीही परिणाम या हातगाडीचालकांवर होत नाहीत. नागरिकदेखील आरोग्याची पर्वा न करता या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. हातगाडीवरील खाद्यपदार्थ हे कमी पैशात भूक भागविण्याचे माध्यम झाले आहे. अनेकजण झटपट काहीतरी खाण्याच्या नादात या खाद्यपदार्थांवर तुटून पडतात. त्यामुळे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विकणाºयांची संख्या वाढत आहे.अंबरनाथ असो वा बदलापूर या दोन्ही ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. आजुबाजुचा परिसर नेहमीच अस्वच्छ असतानाही, त्याचठिकाणी खाद्यपदार्थ विकेल जातात. एवढेच नव्हे तर उतलेले खाद्यपदार्थ त्याचठिकाणी फेकून देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अंबरनाथ स्टेशन परिसरात सायंकाळी ७ नंतर चायनिज खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात येतात. या खाद्यपदार्थांतूनही धोका होण्याची शक्यता आहे. येथेही स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. ज्याठिकाणी हे खाद्यपदार्थ बनविले जातात त्याच ठिकाणी गटार असून तेथील माशांमुळे आरोग्यास अपाय होण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी लावण्यात येणाºया एलईडी दिव्यांवर उडणारी पाखरे खाद्यपदार्थात बरेचदा पडतात. त्यादृष्टीनेही येथे कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी झुरळांचा त्रास आहे. शहरात अनेक ठिकाणी स्नॅक्स कॉर्नरच्या नावावर दिवसागणीक हातगाड्यांची संख्या वाढत आहे. सध्या वड्यात पाल आढळल्याची चर्चा असली तरी भविष्यात यापेक्षाही घातक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नियमांची सर्रास पायमल्लीखाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रसासनाचा रितसर परवाना काढणे गरजेचे आहे. ते काढणे सोपे झाले आहे. मात्र कायदा धाब्यावर बसवून अनेक हातगाडीचालक बेधडकपणे खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत.शहरात अनेक हातगाड्यांनी नियम मोडलेले असले, तरी त्यांनी स्वच्छतेची चोख व्यवस्था केलेली आहे. मात्र काही दुकानदारांनी हे नियम धाब्यावर बसवून अस्वच्छ ठिकाणी आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे पालिकेने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्यbadlapurबदलापूर