शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आॅनलाइनमुळे आरटीओ परवान्यांचे वाटप झाले ५० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:22 IST

ठाणे परिवहन (आरटीओ) विभागाच्या आॅनलाइनपद्धतीमुळे परवानावाटपामध्ये आता बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आणि सुसूत्रता दिसू लागली आहे.

ठाणे : ठाणे परिवहन (आरटीओ) विभागाच्या आॅनलाइनपद्धतीमुळे परवानावाटपामध्ये आता बऱ्याच प्रमाणात पारदर्शकता आणि सुसूत्रता दिसू लागली आहे. त्यातच परवान्यांसाठी अर्ज करणा-या ५० टक्के अर्जदार शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) देताना गटांगळ्या खाताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत परवानावाटप होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच अवैधरीत्या वाटप होणा-या परवान्यांवर निर्बंध आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे आरटीओ विभागांतर्गत ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई हे उपविभाग कार्यरत आहेत. या विभागांतर्गत वर्षभरात जवळपास ५० ते ५२ हजारांच्या आसपास विविध प्रकारांच्या वाहनांचे परवानेवाटप होत होते. मात्र, २०१६-१७ मध्ये आॅनलाइन पद्धत सुरू झाली. त्यामुळे परवान्यांसाठी अर्ज घेण्यापासून त्याची फीही आॅनलाइन पद्धतीने भरता येत आहे. त्यामुळे अर्जदारांना आता आरटीओ कार्यालयात इतर परवान्यांसाठी मारावे लागणारे हेलपाटेही मारणे बंद झाले आहे. तसेच दलालांना पैसे देऊन ही कामे क रून घ्यावी लागत होती, ते बंद झाले आहे. ठाणे परिवहन विभागाने २०१२ या सालातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान ५६ हजार तीन परवान्यांचे वाटप केले आहे. तर, २०१३ मध्ये ५२ हजार १३६, २०१४ या वर्षात ४८ हजार ६३९, २०१५ सालात ५२,०७१ तसेच २०१६ या वर्षभरात ५८ हजार ४५६ परवान्यांचे वाटप झाले आहे. मात्र, आॅनलाइन पद्धत सुरू झाल्यापासून हे प्रमाण घटण्यास सुरुवात झाली आहे. २०१७ या वर्षभरात अवघे ४१ हजार २८५ परवान्यांचे वाटप झाले आहे. यावेळी परवान्यांसाठी जवळपास ८८ हजार २१२ जणांनी अर्ज केले होते. तर, या चालू वर्षात ७२ हजार १७६ जणांनी परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी अवघ्या ३० हजार २२७ जणांना परवान्यांचे आतापर्यंत वाटप झाले आहे.आॅनलाईन पद्धतीमध्ये परवानावाटपाचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी घटले, हे खरे आहे. मात्र आॅनलाईन पद्धतीमुळे एक मोठा फायदा झाला. तो म्हणजे अवैधरीत्या होणारे परवानेवाटप यामुळे पूर्णपणे बंद झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

टॅग्स :onlineऑनलाइनRto officeआरटीओ ऑफीसnewsबातम्या