शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 20:18 IST

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठाणे :

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बॅटरीमध्ये फेरफार झालेल्या स्कूटरवर कारवाईची मोहीम सुरू केली असून अशा ५० स्कूटरवर आतापर्यंत कारवाई केल्याची माहिती ठाणे आरटीओने शनिवारी दिली.

राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनाकरिता इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण अवलंबले आहे. अशा दुचाकींना मोटार वाहनकरातून सूट दिलेली आहे. ताशी २५ किमीपेक्षा कमी वेगाच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीची आवश्यकता नाही. ते चालविण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) ची आवश्यकता नाही. त्यामुळे २५० वॅट बॅटरीच्या स्कूटरच्या खरेदीचा वेग वाढला आहे. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यामुळे अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करून वेग वाढविण्याचा प्रयत्न करतात. बॅटरीची क्षमता वाढविल्याने वाहनांचा वेग वाढत असला, तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशाच काही दुचाकींना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर बेकायदेशीरपणे धावणाऱ्या अशा दुचाकींवर कारवाईचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले.

इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार आरटीओ मान्यताप्राप्त संस्थेचे (व्हेइकल मॉडेल) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र असलेल्या वाहनांनाच नोंदणीमध्ये आरटीओकडून सवलत मिळते. मात्र, असे प्रमाणपत्र न घेता, परस्पर दुचाकीत बदल करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. ठाण्यात १९ ते २७ मे दरम्यान अनधिकृत इलेक्ट्रिक दुचाकीवर कारवाईची धडक मोहीम आरटीओने सुरू केली आहे. आतापर्यंत ५० दुचाकी ठाणे आरटीओने जप्त केल्या. त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होणार आहे. ठाण्यात गेल्या वर्षभरामध्ये एक हजार २९६ दुचाकींची नोंद झाली आहे. ज्या वाहनांना नोंदणीतून सूट आहे, तरीही त्यांनी अंतर्गत बदल केले आहेत. अशा वाहनांवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.""आरटीओकडे नोंदणी न करण्यासाठी एकीकडे सवलत मिळवायची आणि दुसरीकडे वेग वाढविण्यासाठी बॅटरी किंवा अन्य मार्गाने अंतर्गत बदल करायचे. अशा इलेक्ट्रिकल दुचाकींवर कारवाई केली जात आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाण्यातील दुचाकींवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे कोणीही वाहनांमध्ये अंतर्गत बदल करू नये. तसे बदल करणारे पुरवठादार आणि उत्पादक यांचाही शोध घेण्यात येत आहे.""- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

टॅग्स :thaneठाणे