शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 03:17 IST

दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत.

ठाणे : दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार, ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंत चौथ्या फेरीअखेर सुमारे पाच हजार ७४७ जागांवर प्रवेश झाले. जिल्हाभरात अजून १० हजार ७९९ जागा रिक्त आहेत. या प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पाचव्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.लाखो रुपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गांचे शालेय प्रवेश श्रीमंत पालक घेतात. याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारांतील मुलामुलींनादेखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले. पण, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पालकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची बाब या चौथ्या फेरीअखेर उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित पाच अर्ज रिजेक्ट केले आणि २०६ बालकांच्या आईवडिलांनी संबंधित शाळांमध्ये संपर्कच साधलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.प्ले ग्रुप, प्री-केजी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया ६४० शाळांमध्ये या १० हजार ७९९ जागा आजपर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ निवडलेल्यांपैकी ३२८ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतले नाही आणि आता चौथ्या फेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेश घेण्याच्या या प्रक्रियेस विलंब होत आहे.जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारत आहेत. काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रुटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगली वागणूक न देता अपमानित करण्याचादेखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी आहेत. शाळेतील साहित्य, गणवेश, स्कूलबस प्रवास आदी शुल्कांबाबतदेखील पालक व शाळांमध्ये शाब्दिक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. काहींकडे मोबाइल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्यादेखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा