शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:38 IST

कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वास्तुविशारद, कर आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी बिल्डरांशी संगनमत करत कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. या संदर्भात त्यांना एक हजार ८५३ जणांची यादी मिळाली असून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. ही माहिती आणि तक्रारीचे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सादर केले असून गैरव्यवहार उघड केल्याने जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.महापालिका हद्दीत १९९० पासून ओपन लॅण्ड टॅक्स प्रकरणात हा घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडून माहितीच्या अधिकारात तपशील मागवला होता.महापालिकेने अनेक बिल्डरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला. मात्र, त्यांच्याकडून कर वसूल केलेला नाही. काही बिल्डरांनी तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखल न घेताच घरे ताब्यात दिली आहेत. त्या घरांचेही उत्पन्न बुडाले. बाल्कनीचा दंड, स्टेअरकेअस प्रिमियम, सामासिक अंतर न सोडता केलेल्या बांधकामाला रेडीरेकनरनुसार दंड आकारणे आवश्यक होते. तेही न केल्याने पालिकेचे १०० ते १२५ कोटींचे नुकसान झाले.वास्तुविशारद, नगररचना आणि कर विभागाच्या अधिकाºयांच्या बिल्डरांशी असलेल्या संगनमतामुळे एकंदर ५३१ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. वास्तुविशारद आणि बिल्डरांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही. त्यासाठी अधिकाºयांशी हातमिळवणी केली. त्यातून ओपन लॅण्डवरील ३९५ कोटींचा करही थकलेला आहे. ज्यांचा हा कर थकला आहे, त्यांच्याकडून तो वसूल न करता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेल्याने अशा इमारतींना दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे दुहेरी कर आकारणी झाल्याचा आक्षेप घेत अनेकांनी तो भरण्यास नकार दिला.या गैरव्यवहाराच्या माहितीची पार्श्वभूमी सांगताना म्हात्रे म्हणाले, सध्या पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बिल्डरांचा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करूनही नागरिकांना करात सवलत दिलेली नाही. ती करआकारणी अधिक असल्याची टीका होऊनही महासभेने त्यावर निर्णय घेतलेला नाही.बिल्डरांना सवलत देताना सामान्यांचा विचार होणे आवश्यक होते. त्याविषयी महासभेत आवाज उठविला. तसेच प्रशासनाकडे दाद मागितली. पण प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यातून ५३१ कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याची सखोल चौकशी केल्यास त्यातून आणखी काही घबाड हाती लागण्याची शक्यता नाकारतायेत नाही. प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. कारण ते बिल्डरधार्जीणे आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCrimeगुन्हा