शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिका - आत्महत्या करून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे थोडाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 04:03 IST

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील पाणी समस्येबाबत समाधान न झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याची वेळ नगरसेविका साखराबाई बगाडे यांच्यावर आली

पंढरीनाथ कुंभार, भिवंडी

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील पाणी समस्येबाबत समाधान न झाल्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याची वेळ नगरसेविका साखराबाई बगाडे यांच्यावर आली. ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. वारंवार निवडून येणाºया गोल्डन गँगला सांभाळणाºया पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी नगरसेविकेचे इशारा देणारे पत्र फारसे मनावर घेतले नाही. त्यामुळे संताप अनावर झाल्याने भाजपा नगरसेविकेने महापालिका इमारतीच्या तिसºया मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. लागलीच सभागृह सोडून आत्महत्या करण्यासाठी त्या तरातरा निघाल्या. मात्र संतापाने व आत्महत्या करण्याच्या विचाराने त्यांचा रक्तदाब वाढल्याने चक्कर येऊन त्या रस्त्यात कोसळल्या. एका लोकप्रतिनिधीची जर भिवंडी शहरात ही अशी केविलवाणी अवस्था असेल तर सामान्य माणूस महापालिकेच्या कारभारापुढे किती हतबल असेल, याची कल्पनाच करवत नाही. मूळात आत्महत्या करणे हा गुन्हा आहे हे नगरसेवकपदावरील व्यक्तीला माहित हवे. काहीही असो मात्र या घटनेमुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.

महापालिका अधिकारी जसे मस्तवाल आहेत तसेच नगरसेवकांचा बेकायदा नळ जोडण्यांकरिता अधिकाºयांवर दबाव असतो. बºयाच नगरसेवकांनी आपल्या प्रभागात मनमानी करीत मुख्य जलवाहिनीतून जोडणी केली आहे. त्यामुळे काही प्रभागात जास्त वेळ पाणीपुरवठा होतो. एका नगरसेवकाने मनपाची परवानगी नसताना पालिकेचे पाईपलाइन स्वखर्चाने आणून त्याची नियमबाह्य जोडणी केली. वरिष्ठांनी आदेश देऊनही उप अभियंत्यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. एका नगरसेवकाने जबरदस्तीने अनधिकृत इमारतीत पाणीपुरवठा केला तर महापालिका क्षेत्रात विकास दर भरून नव्याने बांधलेल्या अधिकृत इमारतींना पाणीपुरवठा झालेला नाही. अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याऐवजी पाणीपुरवठा अधिकारी त्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे तेथे पाणीपुरवठा केला जात नाही. काही ठिकाणी अधिकारी वर्ग नगरसेवकांमध्ये पाण्यावरुन भांडणे लावून देतात.

भिवंडीला स्टेमकडून ७८ एमएलडी, मुंबई महापालिकेकडून ३५ एमएलडी व भिवंडी महापालिकेकडून २ एमएलडी असा ११५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. या पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने काही ठिकाणी पाण्याची लूट सुरु आहे तर काही ठिकाणी घोटभर पाण्याकरिता लोक तहानलेले आहेत. शहरातील डार्इंग, सायझिंग त्याच प्रमाणे सर्व्हीस सेंटरमध्ये अनधिकृत पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्याचा फटका इतरांना बसत आहे. या पाणी टंचाईवर टँकरलॉबी पोसली जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च होऊन देखील अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात महापालिकेच्या कार्यकारी अभियंता व उप अभियंत्यांना अपयश आले आहे. केवळ योजना राबवण्यासाठी पालिकेचा निधी खर्च करायचा व बिल निघाल्यानंतर त्या योजना धूळ खात ठेवायच्या,असा कारभार गेल्या काही वर्षापासून पालिकेत सुरू आहे.

ज्या साठे नगरमधील नागरिकांसाठी नगरसेविकेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार समिती व दारिद्र्य रेषेखालील वस्ती योजनेंतर्गत आजतागायत कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. शहरातील गायत्रीनगर व रामनगर भागातही कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. परंतु या दोन्ही ठिकाणी पाणी समस्या कायम आहे. या वरून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कसे नियोजन करतात हेच दिसून येते. नगरसेविकेच्या धमकीनंतरही मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी पाणीपुरवठा विभागातील बेजबाबदार अधिकाºयांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.महापालिकेच्या कामाचे नियोजन व्हावे व नागरिकांना नियमीत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून आलेल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. तर सर्व व्यवहार प्रभारी अधिकाºयांकडून हाकला जात आहे. याबाबत शासनाने पालिका अधिकाºयांना जाब विचारलेला नाही. हे सर्व नगरसेवकही खपवून घेत असल्याने त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा प्रभारींना असल्याचे वारंवार दिसून आले आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, नगरविकास विभाग यांनी मुख्य कार्यालयांत आपल्या कामाबाबतचे व कार्यक्षेत्राचे नकाशे लावलेले नाहीत. शहरात ५२ आरसीसी रस्ते बनवण्यास घेतले आहेत.भाजपाच्या नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी त्यांच्या प्रभागातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटत नसल्याने अलीकडेच चक्क महापालिका इमारतीच्या तिसºया मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. भिवंडी शहरात लोकप्रतिनिधींची अवस्था इतकी केविलवाणी असेल तर सर्वसामान्यांची काय पत्रास? या घटनेने महापालिका प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. 

टॅग्स :WaterपाणीBhiwandiभिवंडी