शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून लूटमार सुरूच; मनमानी बिलाची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:27 IST

खोटे मीटर रिडींग नोंदवून पाठवले जाते

भाईंदर : काही दिवसांपूर्वीच मीरा रोडच्या शांतीनगर मधील सोसायटीला नळ जोडणी झाली नसतानाही पाण्याचे बील पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच मीटर रिडींग न घेताच महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग खोटे रिडींग टाकून नागरिकांकडून पाणीपट्टीच्या आड लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५४ हजार इतकी फेब्रुवारीत रिडींग असताना पालिकेने मात्र आधी ५ लाख व नंतर ५ लाख ८० हजार इतके रिडींग नोंदवून पाणीपट्टीचे बील वसूल केले आहे.

मीरा भार्इंदर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा आधीपासूनच घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी विभाग म्हणून ओळखला जातो. तशा विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. बोगस वा अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे नळजोडण्या देणे, अनधिकृत नळजोडण्या नियमित करणे, अनधिकृत बांधकामांना नळ जोडण्या देणे, दुसऱ्याच्या नावाची नळ जोडणी तीही चक्क इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेला देणे, चोरीच्या नळ जोडण्यांना पाठीशी घालणे, बांधकाम सुरु असताना नळजोडण्या देणे, रिडींग न घेणे वा कमी दाखवणे, टँकर पुरवठा घोटाळा अशा अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागा बद्दल आहेत.

काही दिवसांपूर्वीच मीरा रोडच्या शांतीनगर मधील एका इमारतीला नळजोडणी केली नसतानाही चक्क हजारो रुपयांचे पाणीपट्टीचे बील पालिकेने पाठवले होते. रहिवाशांनी तक्रार केली व त्याला प्रसिध्दी माध्यमातून वाचा फुटल्यानंतर बील चुकून गेल्याचे कारण पालिकेने दिले. पालिका निवासी वापरासाठी १३ रुपये प्रती हजार लिटर पाणीपट्टी आकारते.

उत्तनच्या केशवसृष्टी मार्गावर राहणाºया वेलेन्सिया गोम्स यांना तर पाणी मीटरचे ५४ हजार इतके रिडींग असताना पाणीपुरवठा विभागाने ते चक्क ५८ लाख इतके मीटर रिडींग नोंदवत त्या आधारे पाण्याचे बील पाठवले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ असे हे तीन महिन्याचे बील असून १ हजार ४२ इतकी बिलाची रक्कम आहे. या आधीचे मे ते आॅगस्ट २०१९ या कालावधीतील मीटर रिडींग देखील तब्बल ५ लाख इतके नोंदवत चार हजाराचे पाणीपट्टी बील त्यांना पाठवले होते. ते गोम्स यांनी भरलेही. पण त्यांना त्यांची आई राहत असलेल्या इमारतीच्या पाणी बिलाबाबत समजल्यावर त्यांनी स्वत:चे पाण्याचे बिल तपासले असता हा प्रकार उघड झाला.

फेब्रुवारी मध्ये त्यांच्या पाणी मीटरचे रिडींग ५४ हजार आहे तर ५ लाख व ५ लाख ८० हजार इतके रिडींग आले कुठून? असा सवाल केला आहे. त्यांनी या चुकीच्या रिडींगबद्दल तक्रार करत पैसे परत मागितले आहेत. मला माझी आई राहत असलेल्या इमारतीच्या पाणीपट्टी व मीटर रिडींगबाबत कळल्यावर मी माझ्या राहत्या घराचे आलेले पाण्याचे बिल व प्रत्यक्ष मीटर मधील रिडींग घेतले असता मला धक्काच बसला. ५४ हजार इतकेच रिडींग असताना आधीच्या तिमाहीत ५ लाख रिडींग व आताच्या बिलात ५ लाख ८० हजार इतके रिडींग नमूद करून माझ्याकडून पाणीपट्टी वसूल केली आहे. आपले पैसे आपण परत मागितले असून शहरातील नागरिकांनीही आपले बिल आणि प्रत्यक्ष मीटर मधील रिडींग तपासावी.- वेलेन्सिया गोम्स, नागरिक

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र