शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

व्यावसायिक वाहनांना रस्ते दिले आंदण; बेकायदा पार्किंगकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 00:59 IST

बोस मैदानासमोरील रस्ता रुंदीकरणासाठी येथील झोपड्या हटवून पात्र बाधितांना पक्की घरे पालिकेने दिली. परंतु, रुंदीकरण होऊनही या ठिकाणी पदपथावर झोपडीधारकांनी अतिक्रमण केले आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेस सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ विकसित केलेले रस्ते हे लहानमोठ्या वाहनांना फुकटात आंदण दिले आहेत. या भागातील रस्त्यांवर सर्रास बस, डम्पर, कचरागाड्या, रिक्षांच्या बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

बोस मैदानासमोरील एक मुख्य रस्ता भार्इंदर स्थानक ते उत्तन असा जातो. तर, एक ४५ मीटर रुंद रस्ता असून मैदानासमोरून तो उत्तन, भार्इंदर उड्डाणपूल असा जातो. हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आणि वर्दळीचे आहेत. या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी तर वाहनांची संख्या अधिक असते.

बोस मैदानासमोरील रस्ता रुंदीकरणासाठी येथील झोपड्या हटवून पात्र बाधितांना पक्की घरे पालिकेने दिली. परंतु, रुंदीकरण होऊनही या ठिकाणी पदपथावर झोपडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला लागूनही सर्रास बेकायदा वाहने उभी केली जातात. गॅरेज आदी व्यवसाय थाटले आहेत. मैदानाजवळील रस्त्यावर बस, ट्रक यांच्या रांगा लागलेल्या असतात. अगदी निम्मा रस्ताच या मोठ्या वाहनांनी व्यापलेला असतो. यामुळे नेहमीच अपघाताची भीती असते.भार्इंदरकडून मुर्धा-उत्तनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला तर थेट कांदळवनात भराव करून भूखंड तयार केले असून त्या ठिकाणी सर्रास पालिका कंत्राटदाराच्या कचºयाच्या गाड्या, रिक्षा, बस, टेम्पो आदी वाहनांचे अतिक्रमण झालेले आहे. येथेही गॅरेजचे काम केले जाते. पालिकेने पाच लाख खर्चून बांधलेले स्टीलचे बसथांबेही या कचºयाच्या गाड्यांनी धडक मारून तोडले आहेत. पालिकेने येथे तारेचे कुंपण घातले होते, तेही पाडून टाकले आहे. यात पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असताना बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नगरसेवक गप्प आहेत. अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.

या भागात सर्रास होणाºया व्यावसायिक वाहनांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगमुळे नागरिक त्रासलेले असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम नगरसेवक, पोलीस प्रशासन करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.