शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विकास आराखड्यात रस्ता नसताना देखील खाडीत पाईप टाकून रस्ता बांधण्याचा प्रताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 16:05 IST

Mira Bhayander : दहिसर व मीरारोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून दाट कांदळवन आहे

मीरारोड - मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यात पेणकरपाड्यातील खोडियार चाळीपासून दहिसरच्या एन. एल. संकुलास जोडणारा रस्ता विकास आराखड्यात नसताना पालिकेने चक्क सदर रस्त्याच्या नावाखाली खाडी पात्रात पाईप टाकून रस्ता बांधण्याचा प्रकार चालवल्याचा भोंगळपणा उघडकीस आला आहे.

दहिसर व मीरारोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून दाट कांदळवन आहे. गेल्या काही काळात कांदळवनची तोड व भराव करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. दरम्यान पेणकरपाड्यातील सरकारी जागेत तसेच पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या खोडियार चाळींच्या लगत ते खाडी पात्र ओलांडून पलीकडे मुंबईच्या हद्दीतील दहिसरच्या एन एल कॉम्प्लेक्स ला जोडणारा रस्ता बांधायचा प्रस्ताव पालिकेने केला. त्यासाठी चक्क खाडीच्या प्रवाहात पाईप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याचे १९ लाखांचे कंत्राट पालिकेने गजानन कंस्ट्रक्शनला दिले आहे. महापौर ज्योत्सना हसनाळे व भाजपा नगरसेवकांनी त्याचे भूमिपुजन केले होते. 

सदर ठेकेदाराने देखील खाडी पात्रात पाईप टाकून त्यावर भराव केला आहे. परंतु रस्ता बांधून अजून तो मुंबईला जोडण्याचे काम थांबले आहे. वास्तविक मीरा भाईंदर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात येथील खोडियार चाळ ते एन एल कॉम्प्लेक्स ला जोडणारा कोणताच रस्ता नाही आहे. तर सदर रस्ता झाल्यास पेणकरपाडा गावातून वाहनांची वर्दळ प्रचंड वाढून मोठी कोंडी होणार आहे.

त्यातच खाडी पात्रात पाईप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याच्या पालिकेच्या कारभारा बद्दल टीकेची झोड उठली आहे. कारण सदर खाडी पात्र असून पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगर - जंगलातून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी तसेच परिसरातील दहिसर व मीरा भाईंदरच्या हद्दीतील पाणी ह्याच खाडी पात्रातून पुढे जाते. त्यामुळे खाडीपात्रात चक्क पाईप टाकून भराव करण्याचा पालिकेचा भोंगळपणा परिसरात पुरस्थितीला कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. ह्या बाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

सोमनाथ पवार ( स्थानिक रहिवासी व प्रभाग समिती सदस्य ) - सदर रस्ता विकास आराखड्यात नाही . रस्ता बांधल्यास पेणकरपाडा गावात प्रचंड वाहतूक कोंडी होईल. शिवाय खाडीपात्रात पाईप टाकून भराव केल्यास पावसाळ्यात पूरस्थिती होईल. त्यामुळे सदर रस्त्यास आपण विरोध केला असून प्रभाग समितीच्या बैठकीत सदर काम बंद केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर