शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

27 गावातील रस्त्यांची दुरावस्था, कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 15:00 IST

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींकडून करुन देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीये

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. डांबरीकरणाचे रस्तेही केले जात नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक व लोकप्रतिनिधींकडून करुन देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट महापालिका बघत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.कल्याण-शीळ मार्गालगत मानपाडेश्वर मंदिराच्यानजीक बंद असलेल्या प्रिमिअर कंपनीच्या मागच्या बाजूने संदप व उसरघर या गावांकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हा रस्ता पुढे दिवा रेल्वे स्थानकाडे जातो. मानपाडा ते दिव्या दरम्यान असलेल्या 10 गावांना जोडणारा हा रस्ता आहे. महापालिकेत 2015 पासून 27 गावे समाविष्ट झाली आहे. या गावातील रस्ते दुरुस्ती अथवा डांबरीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. गावातील जागरुक नागरीक संतोष संते यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापालिकेने रस्ते तयार केले नाहीत. तसेच रस्त्यावरील खड्डेही बुजविलेले नाहीत. हा रस्त्याचा अर्धा भाग स्थानिक नगरसेविका पूजा पाटील व रविना माळी यांच्या प्रभागात येतो. त्यांच्याकडेही दाद मागितली आहे. नगरस्ेाकांनीही पाठपुरावा केला आहे. रस्त्याची पाहणी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी केली. रस्त्याची दुरुस्ती करतो असे आश्वासन दिले. मात्र त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. केवळ उसरघर व संदप या मार्गाची दुरावस्था झालेली नाही. तर निळजे उसरघर या भागातून अपक्ष निवडून आलेले नगरसेवक प्रभाकर जाधव यांनीही रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा शुक्रवारी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत उपस्थित केला. कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्याचे काम अर्धवट असल्याने जसलीन कुट्टी या 11 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला. त्याविषयी महासभेत बरीच चर्चा झाली. मात्र 27 गावातील रस्ते दुरुस्तीचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करणा:या नगरसेवक जाधव यांचा आवाज महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाबला. कारण चर्चा केवळ सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्यावर सुरु आहे. 27 गावांच्या रस्त्याचा विषय चर्चेला नाही असे सांगून जाधव यांच्या मुद्याला बगल दिली. महापालिकेने महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 12 कोटीची निविदा पावसळ्य़ापूर्वी काढली होती. त्यापैकी किती पैसा 27 गावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर खर्च केला आहे. याची माहिती जाधव यांनी मागितली. प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ही माहिती एका सदस्याला दिली जात नाही. का तर तो अपक्ष सदस्य आहे. या अपक्ष सदस्याने मनसेला पाठिंबा दिला आहे. मनसे महापालिकेत विरोधी बाकावर आहे. त्यामुळे त्याच्या मागणीकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्व दुर्लक्ष केले जाते. सदस्याने मागितलेली माहिती ही जनहिताशी निगडीत असूनही त्याच्या माहितीच्या मागणीला दाद दिली जात नाही. अखेर जाधव यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला असून माहिती मागितली आहे. अद्याप त्याना ही माहिती दिलेली नाही. महापालिका 27 गावातील रस्ते दुरुस्त करीत नाही. खड्डे बुजवित नाही. महापालिका नागरीकांचा जीव जाण्याची वाट बघत आहे. जीव गेल्यावर उपाययोजना करणार आहे  का असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थीत केला आहे.