शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रो-रो सेवेला गोराई-उत्तनकरांचा विरोध; हिरवळ नष्ट होऊन प्रदूषण वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 17:33 IST

राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.हिरवळ नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करुन या सेवेला गोराई-उत्तनकरांनी धारावी बेट बचाव समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शविला.मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत सातही गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

भाईंदर - राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यानंतर गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे येथील हिरवळ नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करुन या सेवेला गोराई-उत्तनकरांनी धारावी बेट बचाव समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शविला आहे. 

शनिवारी सायंकाळी गोराई येथील होली मॅगी चर्चच्या सभागृहात मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत सातही गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोर्डाचे अधिकारी मनीष मेतकर, विजय मनवाणी, प्रशांत सानप यांना ग्रामस्थांनी रो-रो सेवेच्या विरोधात गोराई कुल्वेम सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने फादर एडवर्ड जंसीटो यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. त्यात माथेरान येथील पर्यावरण संवेदनशीलता सरकारकडून जपली जात असताना या गावातील हिरवळीवर पर्यटनाच्या नावाखाली घाला का घातला जातो, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विकासाच्या नावाखाली समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांनी तो झिडकारून आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.

नियोजित रो-रो सेवेसाठी बोरीवली व गोराई खाडी किनारी होणाऱ्या धक्क्याच्या बांधकामामुळे येथील मासळी विक्रीचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. या सेवे अंतर्गत एका बोटीतून एकावेळी किमान १० चारचाकी गाड्या गोराई येथे येणार असून त्यांच्या पार्कींगसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी येथील हिरवळ व कांदळवन नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. येथील हिरवळीमुळे मुंबई उपनगरासह आसपासच्या शहरांना प्राणवायू मिळत असून त्यावरच घाव घालण्याचा डाव राज्य सरकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ही सेवा सुरू झाल्यास गावात मोठ्याप्रमाणात वाहने येऊन वाहतुक कोंडीसह प्रदुषण वाढीची समस्या उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे गावातील रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली तेथील हिरवळी व कांदळवनासह ग्रामस्थांची घरे सुद्धा नष्ट करुन सरकार येथे काँक्रिटचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

खाडीतील मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात येत असतात, कांदळवनच नष्ट झाल्यास मासे अंडी कुठे घालतील, असा प्रश्न उपस्थित करुन मासळीची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त करण्यात आली. गावात मोठे रुग्णालय, प्राथमिक खेरीज माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. त्याचा विकास करण्याऐवजी सरकार ही सेवा केवळ एस्सेल वर्ल्ड व बड्या उद्योगपतींचे हित जोपासण्यासाठीच सुरू करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रापासून बोटींचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी चौक ते गाराई दरम्यानचे अनेक मच्छिमार आपल्या बोटी गोराई खाडीत नांगरतात. रो-रो सेवा सुरू झाल्यास या बोटींना नांगरण्यासाठी जागाच उपलब्ध होणार नसल्याची भिती व्यक्त करुन सरकार ने मच्छिमारांना उध्वस्त करणार असल्याचा  आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी सातही गावांतील ग्रामस्थ व धारावी बेट बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :bhayandarभाइंदरpollutionप्रदूषण