शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:08 IST

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले

- सदानंद नाईकउल्हासनगर : रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असतानाही, राज्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांना जाहिर पाठिंबा दिल्याची माहिती शहर कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भगवान भालेराव संतापले असून, पत्रकार परिषद घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धिपत्रक शहर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी काढले आहे. याप्रकाराने ऐन निवडणुकीच्या काळात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष तथा गटनेते भगवान भालेराव यांनी निवडणूक रिंगणात उतरून रंगत आणली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भालेराव यांना तांत्रिक कारणाने पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याचे स्पष्ट करत, ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. भालेराव यांच्यामुळे शहरात तिरंगी लढत निर्माण झाली. बुधवारी रिपाइंच्या काही पदाधिकाºयांनी कुमार आयलानी यांच्या समक्ष टाउन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयलानी यांना पाठिंबा घोषित केला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपला पाठिंबा घोषित केल्याची माहिती यावेळी राजू सोनावणे यांनी दिली.

रिपाइंतील काही पदाधिकाºयांनी आयलानी यांना पाठिंबा घोषित केल्याने, रिपाइंचे उमेदवार भगवान भालेराव यांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सर्व प्रकार माहीत असून माझा निवडणूक जाहीरनामा त्यांना दिल्याचेही भालेराव यांनी सांगितले. असे असताना पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाºयांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, शहर कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून आयलानी यांना पाठिंबा देणाºयांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले. या प्रकाराने ऐन निवडणुकीत पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शहर कार्यकारिणीतील मोजके पदाधिकारी सोडल्यास इतर पदाधिकारी माझ्यासोबत असल्याचा दावाही भगवान भालेराव यांनी केला.मतदारसंघात तिरंगी लढतमतदारसंघात सुरुवातीला भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र शहरात आहे. शहरात रिपाइंची ताकद मोठी असून आंबेडकरी समाजाची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. भगवान भालेराव यांच्यासह रिपाइंचे तीन नगरसेवक असून यामध्ये धर्मपत्नी अपेक्षा भालेराव यांचाही समावेश आहे.