शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:08 IST

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले

- सदानंद नाईकउल्हासनगर : रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असतानाही, राज्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांना जाहिर पाठिंबा दिल्याची माहिती शहर कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भगवान भालेराव संतापले असून, पत्रकार परिषद घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धिपत्रक शहर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी काढले आहे. याप्रकाराने ऐन निवडणुकीच्या काळात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष तथा गटनेते भगवान भालेराव यांनी निवडणूक रिंगणात उतरून रंगत आणली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भालेराव यांना तांत्रिक कारणाने पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याचे स्पष्ट करत, ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. भालेराव यांच्यामुळे शहरात तिरंगी लढत निर्माण झाली. बुधवारी रिपाइंच्या काही पदाधिकाºयांनी कुमार आयलानी यांच्या समक्ष टाउन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयलानी यांना पाठिंबा घोषित केला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपला पाठिंबा घोषित केल्याची माहिती यावेळी राजू सोनावणे यांनी दिली.

रिपाइंतील काही पदाधिकाºयांनी आयलानी यांना पाठिंबा घोषित केल्याने, रिपाइंचे उमेदवार भगवान भालेराव यांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सर्व प्रकार माहीत असून माझा निवडणूक जाहीरनामा त्यांना दिल्याचेही भालेराव यांनी सांगितले. असे असताना पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाºयांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, शहर कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून आयलानी यांना पाठिंबा देणाºयांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले. या प्रकाराने ऐन निवडणुकीत पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शहर कार्यकारिणीतील मोजके पदाधिकारी सोडल्यास इतर पदाधिकारी माझ्यासोबत असल्याचा दावाही भगवान भालेराव यांनी केला.मतदारसंघात तिरंगी लढतमतदारसंघात सुरुवातीला भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र शहरात आहे. शहरात रिपाइंची ताकद मोठी असून आंबेडकरी समाजाची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. भगवान भालेराव यांच्यासह रिपाइंचे तीन नगरसेवक असून यामध्ये धर्मपत्नी अपेक्षा भालेराव यांचाही समावेश आहे.