शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

रिंगरोडबाधितांची मनसे आमदाराकडे धाव; न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:35 IST

घरे देण्याची मागणी, दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या दरम्यान चौथा ते सातवा टप्पा असून, त्यात अटाळी, आंबिवली, वडवली या परिसरांतील ८०० पेक्षा जास्त नागरिकांची घरे बाधित होत आहेत.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पात अटाळी-वडवली परिसरातील ८०० पेक्षा जास्त जणांची घरे बाधित होत आहेत. त्यामुळे या प्रकल्पबाधितांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. बाधितांना घरे मिळावीत, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली आहे.

मोठागाव ठाकुर्ली ते टिटवाळा असा ३१ किलोमीटरचा रिंगरोड प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाचे सात टप्पे आहेत. त्यापैकी सध्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यांचे काम सुरू झालेले आहे. अन्य टप्प्यांची कामे सुरू झालेली नाहीत. दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या दरम्यान चौथा ते सातवा टप्पा असून, त्यात अटाळी, आंबिवली, वडवली या परिसरांतील ८०० पेक्षा जास्त नागरिकांची घरे बाधित होत आहेत. या टप्प्यांतील रिंगरोडच्या कामासाठी ८० टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित २० टक्के भूसंपादन बाकी आहे. नुकतीच प्रकल्पाची आढावा बैठक मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली. त्यावेळी प्रकल्पबाधितांची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले होते. ही सुनावणी प्रभाग अधिकारी स्तरावर होणार होती. मात्र, ती अद्याप झालेली नाही. प्रकल्पबाधितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान प्रकल्पबाधितांचे म्हणणो पाटील यांनी ऐकून घेतले. या प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.

आठवले यांनी आदेश देऊनही तोडगा नाही प्रकल्पबाधितांच्या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सहा महिने आधी मुंबईत एक बैठक बोलावली होती.  त्यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या चर्चेच्या वेळी प्रकल्पबाधितांचे नुकसान होणार नाही, यावर तोडगा काढावा, असे आदेश आठवले यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशानंतरही काहीच न झाल्याने प्रकल्पबाधितांनी मनसे आमदारांकडे धाव घेतली आहे. 

टॅग्स :MNSमनसे