शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

'माहिती अधिकाराची ही गळचेपीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 00:14 IST

सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांसह, राज्यांतील सर्व माहिती आयुक्त यापुढे पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.

- अजित मांडके भारताच्या सर्वात पवित्र अशा लोकशाहीच्या सभागृहात अर्थात संसदेत नुकतेच माहिती अधिकार कायदा-२०१९ चे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांसह, राज्यांतील सर्व माहिती आयुक्त यापुढे पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यामुळे काय धोके येणार आहेत. या संदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक तथा जाग संस्थेचे पदाधिकारी मिलिंद गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...माहिती अधिकारात जी काही सुधारणा करण्यात आली त्याचा परिणाम काय होऊ शकेल ?नक्कीच माहिती अधिकाराचे जे सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे, ते माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी घातकच आहे. एक प्रकारे स्वायस्त संस्थांवर घाला घालण्याचाच हा प्रकार आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. वास्तविक, पाहता स्वायत्त संस्थाची भविष्यात यामुळे गळचेपीच होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एखादा प्रश्न विचारायचा झाला तरी माहिती अधिकार कार्यकर्त्याला १०० वेळा विचार करायला लागणार आहे. त्यामुळे हे विधेयक माझ्या दृष्टीने चुकीचेच आहे.बदलेल्या या कायद्याच्या कोणाला फटका बसणार आहे ?माहिती अधिकाराचे बदलेले स्वरुप हे या अधिकारामार्फत माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्याला घातक ठरणार आहे. शिवाय त्याने एखादा प्रश्न विचारला तरी त्यावर आता यामुळे बंधने निर्माण होणार आहेत. आता एखादा प्रश्न विचारायचा झाला तर त्याचे पहिले किंवा दुसरे अपीलही घेतले जात नाही. आता या नव्या स्वरुपामुळे जे अधिकारी यात काम करणार आहेत, त्यांना सुद्धा माहिती देतांना राज्यकर्त्यांची भिती वाटणार आहे. कारण एखाद्या माहितीमध्ये त्यांनी खरी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलावरही या निर्णयामुळे असणार आहे.माहिती अधिकार आयुक्त पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असणे योग्य वाटते का?मूळात माहिती अधिकार आयुक्तांवर अशा पद्धतीने निर्बंध घालणेच चुकीचे आहे. यामुळे आयुक्तांच्या कार्यकक्षा सिमीत होणार आहेत. तसेच माहिती देतांना त्यांना कारवाईच्या भितीने माहिती योग्य प्रकारे देणेसुद्धा कठीण जाणार आहे. मूळात माहिती अधिकारात माहिती मागणे हा काही गुन्हा ठरू शकत नाही. परंतु, यामुळे राज्यकर्त्यांची कातडी वाचविण्याचाच हा प्रकार आहे. त्यांना यातून मोकळे रान मिळणार आहे.आयुक्तांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रद्द करणे योग्य आहे का?भारताच्या विद्यमान माहिती आयुक्तांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच माहिती देण्याचे आदेश बजावल्याने, कायद्यात बदल करून भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा लोकशाही विरोधी प्रकार आहे. यामुळे माहिती अधिकाराला किमंत उरणार नाही, असेच दिसत आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार