शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'माहिती अधिकाराची ही गळचेपीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 00:14 IST

सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांसह, राज्यांतील सर्व माहिती आयुक्त यापुढे पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.

- अजित मांडके भारताच्या सर्वात पवित्र अशा लोकशाहीच्या सभागृहात अर्थात संसदेत नुकतेच माहिती अधिकार कायदा-२०१९ चे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांसह, राज्यांतील सर्व माहिती आयुक्त यापुढे पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यामुळे काय धोके येणार आहेत. या संदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक तथा जाग संस्थेचे पदाधिकारी मिलिंद गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...माहिती अधिकारात जी काही सुधारणा करण्यात आली त्याचा परिणाम काय होऊ शकेल ?नक्कीच माहिती अधिकाराचे जे सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे, ते माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी घातकच आहे. एक प्रकारे स्वायस्त संस्थांवर घाला घालण्याचाच हा प्रकार आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. वास्तविक, पाहता स्वायत्त संस्थाची भविष्यात यामुळे गळचेपीच होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एखादा प्रश्न विचारायचा झाला तरी माहिती अधिकार कार्यकर्त्याला १०० वेळा विचार करायला लागणार आहे. त्यामुळे हे विधेयक माझ्या दृष्टीने चुकीचेच आहे.बदलेल्या या कायद्याच्या कोणाला फटका बसणार आहे ?माहिती अधिकाराचे बदलेले स्वरुप हे या अधिकारामार्फत माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्याला घातक ठरणार आहे. शिवाय त्याने एखादा प्रश्न विचारला तरी त्यावर आता यामुळे बंधने निर्माण होणार आहेत. आता एखादा प्रश्न विचारायचा झाला तर त्याचे पहिले किंवा दुसरे अपीलही घेतले जात नाही. आता या नव्या स्वरुपामुळे जे अधिकारी यात काम करणार आहेत, त्यांना सुद्धा माहिती देतांना राज्यकर्त्यांची भिती वाटणार आहे. कारण एखाद्या माहितीमध्ये त्यांनी खरी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलावरही या निर्णयामुळे असणार आहे.माहिती अधिकार आयुक्त पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली असणे योग्य वाटते का?मूळात माहिती अधिकार आयुक्तांवर अशा पद्धतीने निर्बंध घालणेच चुकीचे आहे. यामुळे आयुक्तांच्या कार्यकक्षा सिमीत होणार आहेत. तसेच माहिती देतांना त्यांना कारवाईच्या भितीने माहिती योग्य प्रकारे देणेसुद्धा कठीण जाणार आहे. मूळात माहिती अधिकारात माहिती मागणे हा काही गुन्हा ठरू शकत नाही. परंतु, यामुळे राज्यकर्त्यांची कातडी वाचविण्याचाच हा प्रकार आहे. त्यांना यातून मोकळे रान मिळणार आहे.आयुक्तांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रद्द करणे योग्य आहे का?भारताच्या विद्यमान माहिती आयुक्तांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच माहिती देण्याचे आदेश बजावल्याने, कायद्यात बदल करून भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा लोकशाही विरोधी प्रकार आहे. यामुळे माहिती अधिकाराला किमंत उरणार नाही, असेच दिसत आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार