शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकांनो ‘प्रवासी ग्राहक देवो भव:’ विद्यार्थ्यांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 18:32 IST

ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे.

कल्याण : ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले आहे. तसेच त्यांनी रिक्षा व रिक्षाचालकांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले.    पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक हायस्कूल शाळेतील विद्याथ्र्यानी आज सकाळी कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांना पत्र दिले. कल्याण-डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा. त्यासाठी रिक्षाचालकांच्या माध्यमातून संदेश जावा, रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे ही दिले जावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना नगरसेवक आणि रिक्षा टॅक्सी  संघटना अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, आरटीओचे वाहन निरीक्षक जाफर काझी, डी. के . महाले, शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संगीता पाटील, शोभा देशमुख, ओमप्रकाश धनविजय, गणोश पाटील आणि रेल्वे पोलिस आधिकारी शिक्षकवर्ग उपस्थित होता.     विद्यार्थिनींनी दिलेल्या पत्रात तुमचा व्यवसाय लोकांच्या सेवाकरिता आहे. तेव्हा लोकांशी अतिशय गोड बोलले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात मग तो डॉक्टर असो किंवा वकील ते आपल्याकडे येणा-या व्यक्तीशी गोड बोलतात. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास तो निर्धास्त होऊन प्रवास करू शकेल. त्यामुळे व्यवसायात भरच पडेल. भाडे नाकरू नका. तीन सीट्सनंतर प्रवाशांना चौथ्या सीटसाठी ताटकळत ठेवू नका. वाढत्या खाजगी वाहनांमुळे व्यवसाय कमी होत आहे. त्यातच रिक्षाचाच वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. भविष्यात या व्यवसायावर गदा येऊ नये म्हणून आतापासूनच विचार करा  या आशयाचे पत्र देण्यात आले.    या आगळ्य़ा वेगळ्य़ा उपक्रमांचे सर्वानी स्वागत करीत एकत्र येऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी वर्गाला दिले. 

टॅग्स :kalyanकल्याण