शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:14 IST

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली : शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ते भरण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हतबल झालेल्या जुनी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी स्वत:हून पुढाकार घेत नुकतेच हे खड्डे भरले.जुनी डोंबिवली येथील स्टॅण्डवर जवळपास २०० रिक्षाचालक अनेक वर्षे व्यवसाय करतात. सध्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टॅण्डप्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अ‍ॅनेक्स फर्नांडिस, अरुण कोचरेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे असतातच. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात, हे माहीत नाही. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे रिक्षात प्रवासी म्हणून बसले की, पोटात गोळा येतो. खड्ड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे, असा मोठा पेच पडतो, असे कोचरेकर सांगतात.पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षाचालकांना अंग, कंबरदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. संपूर्ण शरीराची हेळसांड होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांतून रिक्षा गेल्याने गाडीचेही नुकसान होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. जोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील २० मोठे खड्डे गुरुवारपासून बुजवले. परंतु, जुनी डोंबिवली ते गिरिजामाता मंदिर परिसरात १० इंचांचे खड्डे पडले असून ते भरणे कठीण आहे. डेब्रिज टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. डेब्रिज टाकून समस्या सुटणार नाही, हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो, हे समजावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक शाखा, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्येकडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.महापालिका प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरून आम्हाला प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल तसेच आमचे आरोग्यही राखले जाईल, असेही रिक्षाचालक म्हणाले.कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणेही या पश्चिमेत राहत असून, त्यांचाही हा येण्याजाण्याचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे त्यांनी येथील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही रिक्षाचालकांनी केली.यासंदर्भात महापौर राणे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन तातडीने खड्डे भरण्याबाबत संबंधितांना आदेश दिले जातील, असे सांगितले. अतिपावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आधी जुनी डोंबिवली येथील रस्ते ठीक होते. आता पाऊस कमी झाला की, रस्त्यांची कामे करून घेऊ.- विश्वनाथ राणे, नगरसेवक वरहिवासी जुनी डोंबिवली

टॅग्स :dombivaliडोंबिवली