शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जुनी डोंबिवलीत रिक्षाचालकांनीच बुजवले खड्डे, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:14 IST

डोंबिवली शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली : शहरात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. ते भरण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे हतबल झालेल्या जुनी डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी स्वत:हून पुढाकार घेत नुकतेच हे खड्डे भरले.जुनी डोंबिवली येथील स्टॅण्डवर जवळपास २०० रिक्षाचालक अनेक वर्षे व्यवसाय करतात. सध्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याने प्रवाशांना समाधानकारक सुविधा देता येत नसल्याची खंत स्टॅण्डप्रमुख विलास पंडित, मॅक्सी तिरोडकर, प्रकाश जनकर, प्रकाश बागडे, सुरेश पवार, अ‍ॅनेक्स फर्नांडिस, अरुण कोचरेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.ते म्हणाले की, खड्ड्यांची दयनीय अवस्था ही काही यंदाची नाही. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे असतातच. त्याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात, हे माहीत नाही. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे रिक्षात प्रवासी म्हणून बसले की, पोटात गोळा येतो. खड्ड्यात रिक्षा गेली आणि त्यांना काही झाले तर काय करायचे, असा मोठा पेच पडतो, असे कोचरेकर सांगतात.पंडित म्हणाले की, तक्रारी तरी किती करायच्या. रिक्षाचालकांना अंग, कंबरदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना वयोमानाप्रमाणे छातीचे विकार आहेत. संपूर्ण शरीराची हेळसांड होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांतून रिक्षा गेल्याने गाडीचेही नुकसान होते. त्यामुळे अखेरीस आम्हीच खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. जोंधळे शाळा परिसर, देवी चौक या मार्गावरील २० मोठे खड्डे गुरुवारपासून बुजवले. परंतु, जुनी डोंबिवली ते गिरिजामाता मंदिर परिसरात १० इंचांचे खड्डे पडले असून ते भरणे कठीण आहे. डेब्रिज टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. डेब्रिज टाकून समस्या सुटणार नाही, हे माहिती आहे, पण तरीही प्रशासनाला समस्या दिसावी आणि प्रवाशांना आम्ही भाडे का नाकारतो, हे समजावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. वाहतूक शाखा, आरटीओ अधिकारी यांनीही या समस्येकडे लक्ष द्यावे आणि महापालिका प्रशासनाला रस्ते दुरुस्त करण्याचे आवाहन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.महापालिका प्रशासनाने चांगले रस्ते द्यावेत, जेणेकरून आम्हाला प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल तसेच आमचे आरोग्यही राखले जाईल, असेही रिक्षाचालक म्हणाले.कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणेही या पश्चिमेत राहत असून, त्यांचाही हा येण्याजाण्याचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे त्यांनी येथील खड्ड्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही रिक्षाचालकांनी केली.यासंदर्भात महापौर राणे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन तातडीने खड्डे भरण्याबाबत संबंधितांना आदेश दिले जातील, असे सांगितले. अतिपावसामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आधी जुनी डोंबिवली येथील रस्ते ठीक होते. आता पाऊस कमी झाला की, रस्त्यांची कामे करून घेऊ.- विश्वनाथ राणे, नगरसेवक वरहिवासी जुनी डोंबिवली

टॅग्स :dombivaliडोंबिवली