शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा संघटनेला हवी किमान सात रुपये भाडेवाढ; २०१५ पासून भाडेवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:27 IST

दोन वर्षांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही

कल्याण : राज्य सरकारने २०१५ पासून रिक्षा प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. त्यामुळे थकीत असलेली भाडेवाढ देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केली आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी मीटरनुसार १८ रुपये आकारले जाते. त्यात सात रुपये भाडेवाढ करून २५ रुपये किमान भाडे निश्चित करावे, असा प्रस्ताव महासंघाने परिवहन प्रशासनाकडे मांडला आहे.

महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले की, ‘सरकारने कल्याणसह कोकण परिसरातील रिक्षा चालकांना २०१५ मध्ये भाडेवाढ दिली होती. त्यानुसार दर पत्रक परिवहन विभागाने जाहीर केले होते. त्यानंतर आजपर्यंत भाडेवाढ दिलेली नाही. कोकण विभागातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालत आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांचे प्रमाण कमी आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपये वाढ झालेली आहे. मात्र, रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही. २०१८ मध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे मांडला होता. मात्र, त्यावर अद्याप विचारविनिमय झालेला नाही. वाढती महागाई आणि इंधन दरवाढ होऊनही रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘१८ टक्के दरवाढ करण्यास राज्य परिवहन महामंडळाने परिवहन प्रशासनास मान्यता दिली आहे. तसेच हकीम समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी मे महिन्यात भाडेवाढीनुसार प्रवासी भाड्याचे दरपत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, ही शिफारस सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहे. विद्यमान सरकारने नियुक्त केल्या समितीने भाडेवाढीच्या बाजूने शिफारस केली आहे. रिक्षा देखभालीची खर्च धरून रिक्षा चालकंना कमी प्रवासी भाडे परवडत नसल्याचा मुद्दा महासंघाने उपस्थित केला आहे.’

‘रिक्षा स्टॅण्डच्या जागा अधिकृत आहेत. मात्र, तेथे अन्य वाहने बेकायदा उभी केली जातात. त्यामुळे तेथे रिक्षा स्टॅण्ड बनवून देण्यात यावेत, अशी मागणी परिवहन विभागाकडे केली होती. मात्र, एकही रिक्षा स्टॅण्ड प्रशासनाने अद्याप तयार करून दिलेला नाही. तसेच एमएमआरए क्षेत्रात शेअर-ए-रिक्षा स्टॅण्डला मंजुरी मिळाली होती. तेथे भाडे दरपत्रक न लावल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या शेअर-ए- रिक्षा स्टॅण्डच्या जागा बळकावल्या आहेत. तेथे रिक्षा चालकांकडून हप्ता वसुली केली जाते, या मुद्याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे,’ असे ते म्हणाले.

मनमानी भाडेआकारणी सुरूच

महासंघाने भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू नाहीत. मात्र, तरीही भाडे दरपत्रक हे मीटर रिक्षानुसार ठरविले जाते. कल्याणमध्ये ९५ टक्के रिक्षाचालक हे शेअर भाडे आकारून व्यवसाय करतात. मीटर रिक्षा व सीएनजी रिक्षा प्रवासी भाडे दर पत्रकाच्या एकूण ३३ टक्के प्रमाणात शेअर भाडे आकारले जाते. मात्र अनेक ठिकाणी रिक्षाचालक ३३ टक्केच्या रेशो ग्राह्य न धरता मनमानीपणे प्रवासी भाडे आकारता. काही वेळेस तर वाहतूककोंडीच्या नावाखाली आणखी तीन ते पाच रुपये जास्तीचे भाडे प्रवाशांकडून वसूल केले जाते.स्वयंघोषित शेअर रिक्षा भाडेवाढीच्या विरोधात आरटीओकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ही देखील वस्तूस्थिती आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र