शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रिक्षा संघटनेला हवी किमान सात रुपये भाडेवाढ; २०१५ पासून भाडेवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:27 IST

दोन वर्षांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय नाही

कल्याण : राज्य सरकारने २०१५ पासून रिक्षा प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. त्यामुळे थकीत असलेली भाडेवाढ देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केली आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी मीटरनुसार १८ रुपये आकारले जाते. त्यात सात रुपये भाडेवाढ करून २५ रुपये किमान भाडे निश्चित करावे, असा प्रस्ताव महासंघाने परिवहन प्रशासनाकडे मांडला आहे.

महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले की, ‘सरकारने कल्याणसह कोकण परिसरातील रिक्षा चालकांना २०१५ मध्ये भाडेवाढ दिली होती. त्यानुसार दर पत्रक परिवहन विभागाने जाहीर केले होते. त्यानंतर आजपर्यंत भाडेवाढ दिलेली नाही. कोकण विभागातील सर्व रिक्षा सीएनजीवर चालत आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांचे प्रमाण कमी आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपये वाढ झालेली आहे. मात्र, रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही. २०१८ मध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाकडे मांडला होता. मात्र, त्यावर अद्याप विचारविनिमय झालेला नाही. वाढती महागाई आणि इंधन दरवाढ होऊनही रिक्षाचालकांना भाडेवाढ दिलेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘१८ टक्के दरवाढ करण्यास राज्य परिवहन महामंडळाने परिवहन प्रशासनास मान्यता दिली आहे. तसेच हकीम समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी मे महिन्यात भाडेवाढीनुसार प्रवासी भाड्याचे दरपत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, ही शिफारस सरकारने बासनात गुंडाळून ठेवली आहे. विद्यमान सरकारने नियुक्त केल्या समितीने भाडेवाढीच्या बाजूने शिफारस केली आहे. रिक्षा देखभालीची खर्च धरून रिक्षा चालकंना कमी प्रवासी भाडे परवडत नसल्याचा मुद्दा महासंघाने उपस्थित केला आहे.’

‘रिक्षा स्टॅण्डच्या जागा अधिकृत आहेत. मात्र, तेथे अन्य वाहने बेकायदा उभी केली जातात. त्यामुळे तेथे रिक्षा स्टॅण्ड बनवून देण्यात यावेत, अशी मागणी परिवहन विभागाकडे केली होती. मात्र, एकही रिक्षा स्टॅण्ड प्रशासनाने अद्याप तयार करून दिलेला नाही. तसेच एमएमआरए क्षेत्रात शेअर-ए-रिक्षा स्टॅण्डला मंजुरी मिळाली होती. तेथे भाडे दरपत्रक न लावल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या शेअर-ए- रिक्षा स्टॅण्डच्या जागा बळकावल्या आहेत. तेथे रिक्षा चालकांकडून हप्ता वसुली केली जाते, या मुद्याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे,’ असे ते म्हणाले.

मनमानी भाडेआकारणी सुरूच

महासंघाने भाडेवाढीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू नाहीत. मात्र, तरीही भाडे दरपत्रक हे मीटर रिक्षानुसार ठरविले जाते. कल्याणमध्ये ९५ टक्के रिक्षाचालक हे शेअर भाडे आकारून व्यवसाय करतात. मीटर रिक्षा व सीएनजी रिक्षा प्रवासी भाडे दर पत्रकाच्या एकूण ३३ टक्के प्रमाणात शेअर भाडे आकारले जाते. मात्र अनेक ठिकाणी रिक्षाचालक ३३ टक्केच्या रेशो ग्राह्य न धरता मनमानीपणे प्रवासी भाडे आकारता. काही वेळेस तर वाहतूककोंडीच्या नावाखाली आणखी तीन ते पाच रुपये जास्तीचे भाडे प्रवाशांकडून वसूल केले जाते.स्वयंघोषित शेअर रिक्षा भाडेवाढीच्या विरोधात आरटीओकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ही देखील वस्तूस्थिती आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र