शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

दोन महिन्यांनी परतले मायदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:29 IST

ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी सफर : ठाणेकर सायकलस्वाराची कथा

स्रेहा पावसकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी मार्चमध्ये १० महिन्यांच्या नियोजित सायकलसफरीवर निघालेले ठाणेकर राजेश खांडेकर हे अर्जेंटिनातील लॉकडाउनमुळे तेथेच अडकले होते. तब्बल दोन महिन्यांनंतर गुरुवारी रात्री ते ठाण्यात परतले. या दोन महिन्यांच्या कालावधीत आलेले विविध अनुभव त्यांनी ‘लोकमत’सोबत शेअर केले. यादरम्यानच्या कठीण प्रसंगात डोंबिवली सायकल क्लब, अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटी, भारतीय दूतावास हे देवदूतच ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्तकनगर येथे राहणारे राजेश खांडेकर हे व्यावसायिक आहेत. वाढते ग्लोबल वॉर्मिंग पाहता राजेश हे विविध देशांतून सायकलसफरी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. यापूर्वी त्यांनी अनेक सफरी केल्या आहेत. यंदा अर्जेंटिना ते कॅनडा अशा १७ देशांतून राजेश यांची मार्च २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यानची सफर नियोजित होती. १६ मार्च रोजी सफर सुरू करून ते २२ मार्चला अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनूस आयरस शहरात पोहोचले. तिथे १९ मार्चपासूनच लॉकडाउन सुरू झाल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी आणि वैद्यकीय तपासणी केली. तेथील भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीनंतर राजेश यांची अर्जेंटिनातील एका हॉटेलमध्ये सोय केली गेली. लॉकडाउन संपण्याची वाट पाहत हॉटेलमध्ये तब्बल ३८ दिवस राहिल्यानंतर राजेश यांनी खर्चासाठी सोबत नेलेले पैसै संपले. त्यांनी डोंबिवली सायकल क्लबशी संपर्क केला. त्यामाध्यमातून पुण्यातील शरद जाधव यांनी त्यांना अर्जेंटिनात राहणारे उमेश गुप्ता यांचा नंबर दिला आणि राजेश हे पुढील १२ दिवस गुप्ता यांच्या घरी राहिले. मात्र, लॉकडाउन संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. याचदरम्यान चिली देशाचे विमान त्यांच्या नागरिकांना घेण्यासाठी अर्जेंटिनात येणार असल्याची माहिती भारतीय दूतावासाने राजेश यांना दिली. त्यांच्या विनंतीवरून अर्जेंटिनात राजेश यांच्यासह ७० भारतीयांनाही त्या विमानात प्रवेश मिळाला. या प्रवासाचे शुल्क सुमारे एक लाख १५ हजार रुपये (१३२५ डॉलर) होते. राजेश यांच्या हातात पैसे नव्हते. त्यांनी तेथील इंडियन कम्युनिटीला संपर्क केला आणि त्याचे प्रमुख मनोज मेघानी हे देवासारखे धावून आले.अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटीने राजेश यांना ८०० डॉलरची मदत केली, तर उर्वरित ५२५ डॉलर भारतीय दूतावासांनी कर्जाऊ दिले आणि सुमारे ४० तासांचा अर्जेंटिना- चिली- आॅस्ट्रेलिया- बँकॉक असा प्रवास करून ते दिल्लीत आले. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिल्लीत त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले गेले. त्यानंतर ट्रेनने बॉम्बे सेंट्रल आणि तिथून ठाणे असा प्रवास करत ते दोन महिन्यांनंतर सहीसलामत स्वगृही परतले.

या कालावधीत अर्जेंटिनातही कडक लॉकडाउन होते. पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे लोक तंतोतंत पालन करत होते. आपल्याकडेही नागरिकांनी त्याचप्रकारे लॉकडाउनचे नियम पाळले पाहिजे. या संपूर्ण प्रवासात मला अर्जेंटिनातील नागरिकांचे, मार्गदर्शक उमेश ठाकूर आणि विविध हितचिंतकांचे सहकार्य मिळाले. पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कामाची दखल घेत मला इंडियन कम्युनिटीने ८०० डॉलर भेट दिले. माझी सफर अर्धवट राहिल्याची खंत आहे, मात्र, कोरोनानंतर मी ती नक्की पूर्ण करेन.- राजेश खांडेकर, सायकलस्वार