शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१११ कोटी रुपये परत करा

By admin | Updated: May 3, 2017 05:28 IST

बीएसयूपी योजना गुंडाळल्यानंतर आता सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेस या योजनेंतर्गत शहरी गरीबांकरिता घरे

 मुरलीधर भवार / कल्याणबीएसयूपी योजना गुंडाळल्यानंतर आता सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेस या योजनेंतर्गत शहरी गरीबांकरिता घरे बांधण्याकरिता दिलेला १११ कोटींचा निधी परत करण्यास सांगितले आहे. ही योजना सपशेल फसली असली तरी यापूर्वीच ही रक्कम खर्च करुन बसलेल्या महापालिका प्रशासनापुढे ही रक्कम परत कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या योजनेंतर्गत घरे बांधण्याचे लक्ष्य कमी करुनही महापालिकेला सगळया घरांचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. योजनेची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने दिलेला निधी परत करा, असे पत्र सरकारने महापालिका प्रशासनास धाडले आहे. महापालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत १३ हजार घरे बांधण्याचे लक्ष्य सुरुवातीस निश्चित केले होेते. लक्ष्य कमी करुन आठ हजार १८१ घरे बांधण्याचे ठरले. प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने कमी केलेल्या उद्दीष्टातून ४९१ घरे कमी केली. पैसे परत करा तसेच योजनेची मुदत संपल्याने यापुढे पुढील पैसे मिळणार नाही असे पत्र केडीएमसी बरोबरच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थानाही पाठवले आहे. महापालिकेने सरकारकडून आलेला निधी खर्च केला आहे. आता हा निधी परत कशाच्या आधारे करणार असा प्रश्न महापालिकेसमोर उभा ठाकला आहे. या सगळ््या प्रकारामुळे महापालिकेच्या बीएसयूपी योजनेकरीता आर्थिक पेच तयार झाला आहे.बीएसयूपीतील ४९१ घरे न बांधण्याचा निर्णय घेतला असल्याने या घरांच्या बांधकामासाठी लागणारा १५ कोटींचा निधी महापालिका परत करु शकते. मात्र खर्च करण्यात आलेले १११ कोटी कसे काय परत करणार, असा सवाल प्रशासनाने सरकारला केला आहे.बीएसयूपी योजना संथ गतीने सुरु असल्याने या योजनेला यूपीए सरकारच्या नियोजन मंडळाने २४ तास पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देणे नाकारले होते. सरकारकडून निधी मिळाल्यावर योजनेच्या कामाने गती पकडली होती. गती पकडली असतानाच मुदत संपल्याने निधी मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट केल्याने कामात अडथळा उत्पन्न झाला आहे.किती निधी आला आणि किती खर्च झालाप्रकल्प एक, दोन आणि चारमधील घर बांधणीच्या कामाकरीता केंद्र सरकारकडून १६२ कोटी रुपये निधी मिळाला. राज्य सरकारकडून ९४ कोटी निधी मिळाला. केंद्र व राज्याकडून प्राप्त झालेला निधी खर्च झालेला आहे. महापालिकेच्या हिश्शातून ६२ कोटी रुपये उभे केले गेले. त्यापैकी ६१ कोटी रुपये खर्च झाला आहे. आणखीन ११० कोटी रुपये महापालिकेस उभे करावे लागणार आहेत. महापालिकेकडे सगळ््या हिश्श्याचा ४१ कोटी रुपये निधी शिल्लक आहे. एकूण १८१ कोटी रुपये निधी लागणार आहे. महापालिकेने अलीकडेच २६ कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे. हा पैसा महापालिकेस परत करणे शक्य नाही. ज्या कंत्राटदारांकडून घरकूल योजनेचे काम सुरु आहे. त्यांना महापालिका २६ कोटी रुपये कामाच्या बदल्यात देणे लागते. नोटाबंदीमुळे महापालिकेच्या मालमत्ता व पाणीपट्टी कराची कोट्यवधीची विक्रमी वसूली झाली. या पैशातून ठेकेदारांची बिले दिली गेली असे महापालिकेकडून सांगण्यात येत असले तरी बीएसयूपीच्या कंत्राटदाराना त्याचा लाभ झालेला नाही. बीएसयूपी योजनेत लाभार्थ्यांसाठी केवळ नाममात्र रक्कम भरायची होती. केंद्र, राज्य व महापालिकेच्या शिरावर प्रकल्पाच्या रक्कमेचा बोजा जास्त होता. तरी देखील लाभार्थ्यांकडून २५ कोटी रुपये लाभार्थ्यांचा हिस्सा महापालिकेकडे जमा होणे अपेक्षित आहे. बीएसयूपी योजनेत निधीचा जास्त भार केंद्र, राज्य सरकारसह महापालिकेने उचलून लाभार्थी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्यास उत्सुकता दाखवित नसतील तर पंत प्रधान आवास योजनेत केंद्र व राज्याकडून केवळ २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. उर्वरीत घराची रक्कम लाभार्थ्याला भरावयाची आहे. किती घरे बांधून झाली?बीएसयूपी योजनेत कचोरे, उंबर्डे, खंबाळपाडा आणि बारावे येथील खुल्या भूखंडावर व दत्तनगर, आंबेडकरनगर, इंदिरानगर याठिकाणी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीवर घरे बांधली गेली आहेत. तयार झालेल्या घरापैकी १ हजार ३४१ लाभार्थ्यांना व दुसऱ्या टप्प्यात १ हजार ४८५ लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले आहे. पहिल्या प्रकल्प अहवालातील ४ हजार ५९१ घरांपैकी ३ हजार ७२ घरे बांधून झाली आहेत. दुसऱ्या प्रकल्प अहवालातील १ हजार ८४१ घरांपैकी १ हजार १३६ घरे बांधून झाली आहेत. तिसरा प्रकल्प अहवाल रद्द करण्यात आला असून चौथ्या प्रकल्प अहवालात १ हजार ७५६ घरांपैकी १ हजार २६५ घरे बांधून पूर्ण झालेली आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या प्रकल्प अहवालातील उर्वरीत घरे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे.