शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

निकाल लागला, मार्कशीट मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 00:52 IST

बीए मराठीच्या विद्यार्थ्यांचा पेच; पुढील शिक्षण घेताना येताहेत अडचणी

- जान्हवी मोर्येडोंबिवली : के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून एप्रिल-मे २०१९ मध्ये मराठी विषय घेऊन तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेला बसलेल्या १३ पैकी तीन विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १० जणांना ते अजूनही दिलेली नाहीत. मार्कशीट विद्यापीठाकडून आले नसल्याचे कारण वारंवार सांगितले जात असल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा करताच क्लार्कने आॅनलाइन निकालाची प्रत पाहून त्यावर रिझर्व्ह फॉर लोअर एक्झाम (आरईएल) असे लिहिले आहे. त्यामुळे निकाल विद्यापीठाने थांबून ठेवला आहे, असे सांगितले.महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता प्रधान हिने ही परीक्षा दिली होती.

मात्र, निकाल लागून सहा महिने होऊनही तिला मार्कशीट दिलेले नाही. यामुळे माझ्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. याबाबत मुंबई विद्यापीठात पालकांनी चौकशी केली असता महाविद्यालयाने चौथ्या सेमिस्टरची मार्क शीट जमा न केल्याने निकाल राखून ठेवल्याचे सांगितले. तर, विद्यार्थ्याला एटीकेटी लागल्याने विद्यापीठाकडून निकाल आला नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले आहे. मात्र, प्राजक्ता हिने मात्र आपल्याला केटी नसल्याचे सांगितले.

एप्रिल-मे मध्ये झालेल्या पदवी परीक्षेचा निकाल जूनपर्यंत लागतो. सध्या सर्वच निकाल प्रथम आॅनलाइनद्वारे जाहीर होतात. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे मार्कशीट मिळते. जूनमध्ये प्राजक्ता महाविद्यालयात मार्क शीट घेण्यासाठी गेली असता तिला विद्यापीठाकडून मार्क शीट आले नसल्याचे क्लार्कने सांगितले. निकाल लागून सध्या सहा महिने होत आले तरी मार्कशीट मिळालेले नाही. त्यामुळे तिला विद्यापीठाच्या कलिना येथील दुरस्थ शिक्षण विभागातून एमएचे शिक्षण घेताना त्रास होत आहे.

विद्यापीठातून तिला लिंक मिळत नसल्याने दुरस्थ विभागाचे लेक्चर कधी सुरू होणार आहेत किंवा इतर कोणतीही माहिती मिळत नाही. या विभागातर्फे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही लेक्चर घेतले जातात. हे लेक्चर ७ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यापीठातून तिला लिंक ओपन करून माहिती घ्या, असे सांगितले जात आहे. मूळ मार्कशीटची प्रत न दिल्याने ही लिंक ओपन होत नाही. शिवाय, परीक्षा देता येणार नाही. मार्कशीटमुळे सर्वच गोष्टी अडल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.केटी सोडवली असेल तर सांगितले पाहिजे

पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद महाजन यांनी सांगितले, प्राजक्ता प्रधान यांना एसवायबीएच्या चौथ्या सेमिस्टरला केटी लागली आहे. जोपर्यंत केटी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाकडून रिझल्ट मिळत नाही. त्या निकालावर आरईएल लिहिले आहे. प्राजक्ता यांनी एटीकेटी सोडवली असेल त्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे. वारंवार विद्यापीठाला पत्र पाठवावे लागते. १५ आॅक्टोबर २०१९ ला पत्र पाठविले आहे. १७ आॅक्टोबरला विद्यापीठाचा शिक्का आहे. ३७ विद्यार्थ्यांचा निकाल आरईएल आहे. त्यापैकी चार मुले पुढे आली असून, त्यांचा निकाल विद्यापीठाकडे पाठविला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांना निकाल देतो.

टॅग्स :Studentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवस