शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
3
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
4
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
5
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
6
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
7
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
8
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
9
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
10
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
11
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
12
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
13
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
14
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
15
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
16
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
17
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
18
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
19
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
20
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 

निकाल लागला, मार्कशीट मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 00:52 IST

बीए मराठीच्या विद्यार्थ्यांचा पेच; पुढील शिक्षण घेताना येताहेत अडचणी

- जान्हवी मोर्येडोंबिवली : के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून एप्रिल-मे २०१९ मध्ये मराठी विषय घेऊन तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेला बसलेल्या १३ पैकी तीन विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १० जणांना ते अजूनही दिलेली नाहीत. मार्कशीट विद्यापीठाकडून आले नसल्याचे कारण वारंवार सांगितले जात असल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा करताच क्लार्कने आॅनलाइन निकालाची प्रत पाहून त्यावर रिझर्व्ह फॉर लोअर एक्झाम (आरईएल) असे लिहिले आहे. त्यामुळे निकाल विद्यापीठाने थांबून ठेवला आहे, असे सांगितले.महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता प्रधान हिने ही परीक्षा दिली होती.

मात्र, निकाल लागून सहा महिने होऊनही तिला मार्कशीट दिलेले नाही. यामुळे माझ्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. याबाबत मुंबई विद्यापीठात पालकांनी चौकशी केली असता महाविद्यालयाने चौथ्या सेमिस्टरची मार्क शीट जमा न केल्याने निकाल राखून ठेवल्याचे सांगितले. तर, विद्यार्थ्याला एटीकेटी लागल्याने विद्यापीठाकडून निकाल आला नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले आहे. मात्र, प्राजक्ता हिने मात्र आपल्याला केटी नसल्याचे सांगितले.

एप्रिल-मे मध्ये झालेल्या पदवी परीक्षेचा निकाल जूनपर्यंत लागतो. सध्या सर्वच निकाल प्रथम आॅनलाइनद्वारे जाहीर होतात. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे मार्कशीट मिळते. जूनमध्ये प्राजक्ता महाविद्यालयात मार्क शीट घेण्यासाठी गेली असता तिला विद्यापीठाकडून मार्क शीट आले नसल्याचे क्लार्कने सांगितले. निकाल लागून सध्या सहा महिने होत आले तरी मार्कशीट मिळालेले नाही. त्यामुळे तिला विद्यापीठाच्या कलिना येथील दुरस्थ शिक्षण विभागातून एमएचे शिक्षण घेताना त्रास होत आहे.

विद्यापीठातून तिला लिंक मिळत नसल्याने दुरस्थ विभागाचे लेक्चर कधी सुरू होणार आहेत किंवा इतर कोणतीही माहिती मिळत नाही. या विभागातर्फे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही लेक्चर घेतले जातात. हे लेक्चर ७ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यापीठातून तिला लिंक ओपन करून माहिती घ्या, असे सांगितले जात आहे. मूळ मार्कशीटची प्रत न दिल्याने ही लिंक ओपन होत नाही. शिवाय, परीक्षा देता येणार नाही. मार्कशीटमुळे सर्वच गोष्टी अडल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.केटी सोडवली असेल तर सांगितले पाहिजे

पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद महाजन यांनी सांगितले, प्राजक्ता प्रधान यांना एसवायबीएच्या चौथ्या सेमिस्टरला केटी लागली आहे. जोपर्यंत केटी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाकडून रिझल्ट मिळत नाही. त्या निकालावर आरईएल लिहिले आहे. प्राजक्ता यांनी एटीकेटी सोडवली असेल त्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे. वारंवार विद्यापीठाला पत्र पाठवावे लागते. १५ आॅक्टोबर २०१९ ला पत्र पाठविले आहे. १७ आॅक्टोबरला विद्यापीठाचा शिक्का आहे. ३७ विद्यार्थ्यांचा निकाल आरईएल आहे. त्यापैकी चार मुले पुढे आली असून, त्यांचा निकाल विद्यापीठाकडे पाठविला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांना निकाल देतो.

टॅग्स :Studentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवस