शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल; नागरिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:14 IST

पाहा काय आहे नियमावली. कधी सुरू राहणार दुकानं

ठळक मुद्देहे नियम १५ जूनपर्यंत कायम राहणार

ठाणे : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याचे लक्षात घेऊन  ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील त्यांच्या नियंत्रणातील काही क्षेत्रामध्ये लागू असलेल्या संचार बंदीचे काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजपर्यंत सुरू ठेवता येतील. तर याच वेळेत अत्यावश्यक नसलेली इतर दुकाने मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगळता सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहतील. परंतु ही दुकाने शनिवार व रविवार या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये २९ मेचा कोरोना चाचणी पॉझिटिव्हीटी दर १०टक्के पेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स ४० टक्के पेक्षा कमी प्रमाणात रुग्णांनी भरलेले आहेत. यास अनुसरू जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लागू असलेल्या संचार बंदीचे निर्बंध काही अंशी शिथील केले.यामध्ये दुकानांच्या वेळांसह जीवनावश्यक वस्तूं ‌व इतर वस्तूंचे ई-कॉमर्स माध्यमातून म्हणजे आँनलाईन सेवा घेण्यास मान्यता दिली आहे. वैद्यासकीय व इतर तातडीचे कारणाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी दुपारी ३ वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सर्वांना मज्जाव केला आहे. शासनाच्या आधीच्या आदेशानुसार वस्तूंची घरपोच सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोविडशी निगडीत कामकाज करणार्या कार्यालयांन व्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीनिशी सुरू ठेवता येणार आहे. यापेक्षा अधिक उपस्थिती हवी असेल तर त्यांचे विनंतीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग प्रमुखास तशी परवानगी दिली जाणर आहे. कृषीक्षेत्राशी संबंधित सर्व कृषि सेवा केंद्र व त्याच्याशी निगडित असलेली उत्पादन व वाहतूक सेवा आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

या नेमून दिलेल्या शासन आदेशानुसार काटेकोर अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, निजामपूर, उल्हासनगर महापालिका,  कुळगांव बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्याचे आदेश जारी केले आहेत. जारी केलेले आदेश १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी पारीत केलेले आदेश त्या-त्या महापालिका क्षेत्रामध्ये लागू राहणार आहेत. लागू केलेल्या आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यास सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र