शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल; नागरिकांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:14 IST

पाहा काय आहे नियमावली. कधी सुरू राहणार दुकानं

ठळक मुद्देहे नियम १५ जूनपर्यंत कायम राहणार

ठाणे : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याचे लक्षात घेऊन  ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील त्यांच्या नियंत्रणातील काही क्षेत्रामध्ये लागू असलेल्या संचार बंदीचे काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजपर्यंत सुरू ठेवता येतील. तर याच वेळेत अत्यावश्यक नसलेली इतर दुकाने मॉल्स, शॉपिंग सेंटर्स वगळता सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहतील. परंतु ही दुकाने शनिवार व रविवार या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यातील एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये २९ मेचा कोरोना चाचणी पॉझिटिव्हीटी दर १०टक्के पेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स ४० टक्के पेक्षा कमी प्रमाणात रुग्णांनी भरलेले आहेत. यास अनुसरू जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लागू असलेल्या संचार बंदीचे निर्बंध काही अंशी शिथील केले.यामध्ये दुकानांच्या वेळांसह जीवनावश्यक वस्तूं ‌व इतर वस्तूंचे ई-कॉमर्स माध्यमातून म्हणजे आँनलाईन सेवा घेण्यास मान्यता दिली आहे. वैद्यासकीय व इतर तातडीचे कारणाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी दुपारी ३ वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास सर्वांना मज्जाव केला आहे. शासनाच्या आधीच्या आदेशानुसार वस्तूंची घरपोच सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोविडशी निगडीत कामकाज करणार्या कार्यालयांन व्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीनिशी सुरू ठेवता येणार आहे. यापेक्षा अधिक उपस्थिती हवी असेल तर त्यांचे विनंतीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग प्रमुखास तशी परवानगी दिली जाणर आहे. कृषीक्षेत्राशी संबंधित सर्व कृषि सेवा केंद्र व त्याच्याशी निगडित असलेली उत्पादन व वाहतूक सेवा आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

या नेमून दिलेल्या शासन आदेशानुसार काटेकोर अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, निजामपूर, उल्हासनगर महापालिका,  कुळगांव बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्याचे आदेश जारी केले आहेत. जारी केलेले आदेश १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी पारीत केलेले आदेश त्या-त्या महापालिका क्षेत्रामध्ये लागू राहणार आहेत. लागू केलेल्या आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यास सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र