शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

स्वच्छ शहराची जबाबदारी सर्वांचीच, महापौरांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:42 IST

ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे.

ठाणे : ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता ही नैतिक जबाबदारी मानून काम केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केले.ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता तयार केलेल्या रॅप गीताच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेतली.यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, भाजप गटनेते नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई, प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर, सहायक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. ठाणे शहराची यशोगाथा सांगणाºया ठाणे गौरव या गीताचे गीतकार उपायुक्त संदीप माळवी यांनी ठाणे आपले चमकू दे, हे गीत लिहिले आहे. टाइमपास, टाइमपास २, शर्यत, अशा चित्रपटांचे संगीतकार चिनार-महेश या आघाडीच्या जोडीने या गीताला संगीत दिले आहे.सध्या तरु णांमध्ये रॅप गीताला प्रथम पसंती असून स्वच्छतेबाबतच ठाणे आपले चमकू दे हे गीत सर्वांना आवडेल असेच आहे. शहरातील चित्रपटगृहे, मॉल्स, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणी, घंटागाडी येथे हे गीत वाजविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ठाणे होणार प्लास्टिकमुक्तशहराला स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आपले सर्वांचे आहे ते आपण सर्वांनी समर्थपणे पेलले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे, असेही त्यांनी सांगितले.स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरात परिसर स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकबंदी, हगणदारीमुक्त शहर असे विविध उपक्र म राबविण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.रॅप गीतासोबतच शहरात प्लास्टिक वापर टाळा, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आदी संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी एकदाच वापर करून फेकून देणाºया प्लास्टिकचा वापर बंद करावा. ठाणे शहर प्लास्टिक मुक्त करावे. कापडी पिशव्यांचा वापर करावा. स्वच्छता हे दैनंदिन कामापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेची चळवळ ही मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे