शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

वज्रेची वाडी येथील नागरिकांचे पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:09 IST

तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो

मुरबाड : तालुक्यातील वज्रेची वाडी येथे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो आहे.मुरबाड शहरापासून १० ते १२ किमी अंतरावरील ४० ते ४५ घरांची वस्ती असलेले हे गाव. जवळ जवळ २०० ते २५० लोकांची वस्ती असूनही वज्रेची वाडी येथे भर पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने जंगलात दरी, डोंगर चढ-उतार करीत जावे लागते. एका नाल्यातून खड्डा (डवरा) खोदून पिण्याचे दूषित पाणी आणावे लागते आहे. या गावात २ किमी अंतरावर एकच विहीर आहे. मात्र, त्यातीलही पाणी दूषित आहे.उन्हाळ्यात दोन ते अडीच किमी काळू नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. पावसामुळे ठिकठिकाणचे रस्ते खचलेले तर काही ठिकाणी पाण्याची डबकी असतात. अशातच रस्त्यावर काही ठिकाणी शेवाळही साचलेले असते. अशा रस्त्यावरून चढ - उतार करत पडत - धडपडत फक्त पिण्याच्या पाण्यासाठी ही कसरत करावी लागते.सदर आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कशामुळे दूषित झाले, त्याची सविस्तर पाहणी करण्यात येईल. या दूषित झालेल्या पाण्यामुळे वाडीत साथ उद्भवणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाडआदिवासी वाडीत पाणीपुरवठा करणारी विहीर ही नदीच्या पात्रात आहे. नदीला आलेल्या पुरामुळे साठलेले पाणी दूषित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीने घरोघरी मेडिक्लोरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे.- मोहन घुडे, ग्रामसेवक, पिंपळगाव

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईmurbadमुरबाड