शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा ठणठणाटामुळे गृहसंकुलातील रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत ...

डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरील ४०० सदनिका असलेल्या सर्वाेदय लीला सोसायटीत आठवडाभरापासून पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात येत नसल्याने येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याने रहिवाशांनी माजी नगरसेवक साई शेलार यांच्या पुढाकाराने मंगळवारी मनपाच्या विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

२३ फेब्रुवारीला शटडाउन घेण्यात आले होते. तेव्हापासून ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणीसमस्या भेडसावत आहे. शटडाउननंतर साधारणपणे एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. परंतु, ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही. केवळ अर्धा तास येणारे पाणी अत्यंत कमी दाबाने असल्याने ४०० कुटुंबांना पिण्याचे पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभर ही समस्या कायम असल्याने रहिवाशांमध्ये विशेषत: महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नोव्हेंबरमध्ये पाणीसमस्या भेडसावली होती. त्यावेळी पाण्याच्या जोडण्या वाढवून घ्या, असा सल्ला दिला गेला होता. परंतु, सोसायटीला दिलेल्या पाणी जोडण्यांना पुरेसे पाणी येत नसताना अतिरिक्त जोडण्यांना पुरेसे पाणी येईल का? असा सवाल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांची भेट घेतल्यानंतर मात्र समस्या निकाली निघाली होती. परंतु, पुन्हा पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याने सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देशमाने, सचिव लक्ष्मण इंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक शेलार, उपअभियंता मनोज सांगळे आणि कनिष्ठ अभियंता सुनील वाळुंज यांची भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून समस्येचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जादा पाणी सोडले जाईल, असे सांगितले. तसेच समस्या सुटेपर्यंत पाण्याचे टँकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ

९० फुटी व रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत असल्याने भविष्यात नियोजनाअभावी पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाकडून येथे २० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ प्रस्तावित आहे. हा जलकुंभ लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.

------------