शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

पाण्याचा ठणठणाटामुळे गृहसंकुलातील रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत ...

डोंबिवली : केडीएमसीकडून महिन्यातील दुसरा आणि चौथा मंगळवारी पाण्याचे शटडाउन घेतले जात असल्याने ठाकुर्लीतील गृहसंकुलांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरील ४०० सदनिका असलेल्या सर्वाेदय लीला सोसायटीत आठवडाभरापासून पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात येत नसल्याने येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. तक्रारी करूनही समस्येचे निराकरण होत नसल्याने रहिवाशांनी माजी नगरसेवक साई शेलार यांच्या पुढाकाराने मंगळवारी मनपाच्या विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी लवकरात लवकर समस्या सोडवली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

२३ फेब्रुवारीला शटडाउन घेण्यात आले होते. तेव्हापासून ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणीसमस्या भेडसावत आहे. शटडाउननंतर साधारणपणे एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. परंतु, ‘सर्वाेदय लीला’मध्ये पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही. केवळ अर्धा तास येणारे पाणी अत्यंत कमी दाबाने असल्याने ४०० कुटुंबांना पिण्याचे पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभर ही समस्या कायम असल्याने रहिवाशांमध्ये विशेषत: महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

नोव्हेंबरमध्ये पाणीसमस्या भेडसावली होती. त्यावेळी पाण्याच्या जोडण्या वाढवून घ्या, असा सल्ला दिला गेला होता. परंतु, सोसायटीला दिलेल्या पाणी जोडण्यांना पुरेसे पाणी येत नसताना अतिरिक्त जोडण्यांना पुरेसे पाणी येईल का? असा सवाल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांची भेट घेतल्यानंतर मात्र समस्या निकाली निघाली होती. परंतु, पुन्हा पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याने सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देशमाने, सचिव लक्ष्मण इंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक शेलार, उपअभियंता मनोज सांगळे आणि कनिष्ठ अभियंता सुनील वाळुंज यांची भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून समस्येचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जादा पाणी सोडले जाईल, असे सांगितले. तसेच समस्या सुटेपर्यंत पाण्याचे टँकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ

९० फुटी व रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत असल्याने भविष्यात नियोजनाअभावी पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाकडून येथे २० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ प्रस्तावित आहे. हा जलकुंभ लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.

------------