शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शोध ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:47 IST

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान ठाण्यासह कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांत झाले.

- सुरेश लोखंडेठाणे : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान ठाण्यासह कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांत झाले. या टक्केवारीत भरीव वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही सुरू आहे. एवढेच नव्हे तर २०१४ च्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या क्रिटिकल अर्थात संवेदनशील मतदान केंद्रांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ मतदानकेंद्रांचे तज्ज्ञांद्वारे संशोधन जोरदार सुरू करण्यात आले आहे.अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदारसंघांऐवजी आता ‘क्रिटिकल’ मतदारसंघ म्हणून शोध घेतला जात आहे. यानुसार, गेल्या निवडणुकीला ठाणे जिल्ह्णाच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांत ६४२ मतदानकेंद्रे व पालघर लोकसभा मतदारसंघात १६९ मतदानकेंद्रे ‘क्रिटिकल’ म्हणून घोषितझाली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्णाच्या या तिन्ही मतदारसंघांत अवघे ५० टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यंदा या ७० टक्के मतदान व्हावे, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी निर्भय वातावरणात निर्भीडपणे मतदान करावे, यासाठी प्रशासन सततच्या जनजागृतीद्वारे वातावरणनिर्मिती करत आहे. त्यात कमी मतदान झालेल्या मतदारसंघांचा शोध घेऊन त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याप्रमाणेच सहा हजार ४८८ या मुख्य मतदारसंघांसह नव्याने निश्चित केलेल्या २२७ साहाय्यकारी मतदारसंघांच्या संशोधनातून क्रिटिकल मतदारसंघांचा शोध प्रारंभी पोलिसांकडून घेतला जात आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यांच्यात एकमत होऊन क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड होणार आहे.>कमी मतदानाच्या कारणांची चाचपणी अपेक्षितगेल्या लोकसभा निवडणुकीला अवघे ५० टक्के मतदान झाल्यामुळे प्रशासन तीव्र नाराज आहे. या कमी मतदानाचे कारण काय असावे, याचा शोधदेखील यावेळी घेणे गरजेचे आहे.मतदारांवर दडपण असल्यामुळे की काय, ते मतदानास बाहेर पडले नाही, याचीदेखील चाचपणी होणे अपेक्षित आहे. त्यावेळी जिल्ह्णातील भिवंडी ग्रामीण (६६.२३ टक्के), शहापूर (६५.७८ टक्के) आणि मुरबाड ( ६३.३३ टक्के) या तीन विधानसभांमध्येच जास्त मतदान झाले.एवढेच नव्हे तर कमी मतदान म्हणजे ४० ते ४५ टककयांपेक्षा कमी मतदान झालेल्यांमध्ये उल्हासनगर (३८ टक्के), अंबरनाथ (३९ टक्के), भिवंडी ईस्ट (४४ टक्के), डोंबिवली (४४ टक्के), कल्याण (४४ टक्के) या विधानसभांचा समावेश आहे. तर, ४५ ते ५० टक्के मतदान झालेल्यांमध्ये कल्याण ईस्ट (४५.२३ टक्के) कल्याण ग्रामीण (४७.९६ टक्के), कळवा-मुंब्रा (४७ टक्के), भिवंडी (४९.५७ टक्के), बेलापूर (४९.७९ टक्के), ओवळा-माजिवडा (५० टक्के) तर ऐरोली, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, आदी विधानसभा मतदारसंघांत ५१ ते ५६ टककयांदरम्यान मतदान झालेले आढळून आले आहे.७० ते ७५ टक्के मतदान एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले नसल्यामुळे तीव्र नाराजी आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे