शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

शोध ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:47 IST

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान ठाण्यासह कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांत झाले.

- सुरेश लोखंडेठाणे : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान ठाण्यासह कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांत झाले. या टक्केवारीत भरीव वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही सुरू आहे. एवढेच नव्हे तर २०१४ च्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या क्रिटिकल अर्थात संवेदनशील मतदान केंद्रांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ मतदानकेंद्रांचे तज्ज्ञांद्वारे संशोधन जोरदार सुरू करण्यात आले आहे.अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदारसंघांऐवजी आता ‘क्रिटिकल’ मतदारसंघ म्हणून शोध घेतला जात आहे. यानुसार, गेल्या निवडणुकीला ठाणे जिल्ह्णाच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांत ६४२ मतदानकेंद्रे व पालघर लोकसभा मतदारसंघात १६९ मतदानकेंद्रे ‘क्रिटिकल’ म्हणून घोषितझाली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्णाच्या या तिन्ही मतदारसंघांत अवघे ५० टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यंदा या ७० टक्के मतदान व्हावे, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी निर्भय वातावरणात निर्भीडपणे मतदान करावे, यासाठी प्रशासन सततच्या जनजागृतीद्वारे वातावरणनिर्मिती करत आहे. त्यात कमी मतदान झालेल्या मतदारसंघांचा शोध घेऊन त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याप्रमाणेच सहा हजार ४८८ या मुख्य मतदारसंघांसह नव्याने निश्चित केलेल्या २२७ साहाय्यकारी मतदारसंघांच्या संशोधनातून क्रिटिकल मतदारसंघांचा शोध प्रारंभी पोलिसांकडून घेतला जात आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यांच्यात एकमत होऊन क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड होणार आहे.>कमी मतदानाच्या कारणांची चाचपणी अपेक्षितगेल्या लोकसभा निवडणुकीला अवघे ५० टक्के मतदान झाल्यामुळे प्रशासन तीव्र नाराज आहे. या कमी मतदानाचे कारण काय असावे, याचा शोधदेखील यावेळी घेणे गरजेचे आहे.मतदारांवर दडपण असल्यामुळे की काय, ते मतदानास बाहेर पडले नाही, याचीदेखील चाचपणी होणे अपेक्षित आहे. त्यावेळी जिल्ह्णातील भिवंडी ग्रामीण (६६.२३ टक्के), शहापूर (६५.७८ टक्के) आणि मुरबाड ( ६३.३३ टक्के) या तीन विधानसभांमध्येच जास्त मतदान झाले.एवढेच नव्हे तर कमी मतदान म्हणजे ४० ते ४५ टककयांपेक्षा कमी मतदान झालेल्यांमध्ये उल्हासनगर (३८ टक्के), अंबरनाथ (३९ टक्के), भिवंडी ईस्ट (४४ टक्के), डोंबिवली (४४ टक्के), कल्याण (४४ टक्के) या विधानसभांचा समावेश आहे. तर, ४५ ते ५० टक्के मतदान झालेल्यांमध्ये कल्याण ईस्ट (४५.२३ टक्के) कल्याण ग्रामीण (४७.९६ टक्के), कळवा-मुंब्रा (४७ टक्के), भिवंडी (४९.५७ टक्के), बेलापूर (४९.७९ टक्के), ओवळा-माजिवडा (५० टक्के) तर ऐरोली, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, आदी विधानसभा मतदारसंघांत ५१ ते ५६ टककयांदरम्यान मतदान झालेले आढळून आले आहे.७० ते ७५ टक्के मतदान एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले नसल्यामुळे तीव्र नाराजी आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे