शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नोकरीसाठी दुबईत जाऊन शोषण होत असलेल्या तरुणीची सुटका

By धीरज परब | Updated: June 7, 2024 18:52 IST

. या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल  मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे . 

मीरारोड - एजंटच्या मार्फत दुबईत हॉटेल मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून गेलेल्या भाईंदरच्या २९ वर्षीय तरुणीचे शोषण करून पगार दिला  जात नव्हता . या प्रकरणी पोलिसांच्या भाईंदर भरोसा सेलने परराष्ट्र मंत्रालय व दुबईतील हॉटेल  मालका सोबत चर्चा करून तिला परत भारतात सुखरूप आणले आहे . 

भाईंदर पश्चिम भागात राहणाऱ्या एका महिलेने ३ जून रोजी भाईंदरच्या भरोसा सेल येथे तक्रार अर्ज केला होता . तिची २९ वर्षीय मुलीला दिल्लीतील तरुण ( वय वर्षे ४० ) ह्या एजंटने दुबई येथील एका नामांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट चे काम असुन महिना ७० हजार  रूपये पगार असल्याचे सांगितले होते.  ८ एप्रिल रोजी ती दुबई येथे पोहचल्यावर एजंट तरूण याने तिचा पासपोर्ट व व्हिजा काढून घेतला. तिला ४० ते ५० महिला राहत असलेल्या एका हॉलमध्ये ठेवले.  अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते . जबरदस्तीने अधिक तास काम करवून घेतले जात होते . त्यातच तिला अस्थमा असल्याने तिची तब्बेत खराब होत चालली.   तिने एजंट तरूण यास सांगितले असता, ६ महिने काम करावेच लागेल असे सांगितले. 

हॉटेल मालक सलीम ह्याने पगार हा एजंटला दिला सांगितले . एजंटने तिचा दोन महिन्याचा पगार स्वतःच घेतला . पोलिसांच्या भाईंदर येथील भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या कडे तक्रार आल्यावर शिंदे यांच्या सह भारती देशमुख, आफ्रिन जुन्नैदी, पूजा हांडे, अक्षय हासे, विजय घाडगे यांच्या पथकाने तरुणीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . शिंदे यांना ह्या आधी देखील परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरखरूप आणण्याचा अनुभव होता . 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे  व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तेजश्री शिंदे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  "मदद" या पोर्टलवर तरुणीची माहिती दिली .  तरुणीशी संपर्क करून तिची हकीकत जाऊन घेत तिला धीर दिला . हॉटेल मालकाचा क्रमांक घेऊन शिंदे यांनी त्याच्याशी संपर्क साधला . तिची तब्येत बरी नसून उपचाराची आवश्यकता असल्याने तात्काळ भारतात परत पाठवण्याबाबत चर्चा केली . अखेर मालक सलीम ह्याने तरुणीला परत पाठवण्याची तयारी दर्शवली आणि ती ६ जून रोजी मायदेशी सुखरूप परतली . 

परदेशात कामाचे चांगले पैसे मिळतील या आमिषाने भारतातून कामानिमित्त अनेक मुलींना परदेशात एजंटच्या मार्फतीने पाठवले जाते.  परंतु परदेशातील कायदे व प्रक्रिया माहित नसल्याने अनेक कामगार परदेशामध्ये अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांनी अशा एजंटपासून सावधान रहा व कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे . 

 

टॅग्स :mira roadमीरा रोड