शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

आयुक्त बोडके यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका : विजय सूर्यवंशी यांची नियुक्तीलोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची सरकारने बदली केली असून, त्यांच्या जागी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. बोडके यांची बदली ही नैमित्तिक आहे. सूर्यवंशी हे रायगडचे जिल्हाधिकारी असून, ते कधी पदभार स्वीकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार बोडके यांनी १९ मार्च २०१८ ला घेतला होता. त्यापूर्वी बोडके हे सरकारच्या मत्स्य विभागात कार्यरत होते. ते भारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळून आयुक्त झाले होते. महसूल विभागाचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे महापालिकेचा कारभार ते प्रथमच हाकत होते. महापालिकेत बोडके यांनी एक वर्ष, ११ महिने काम पाहिले. मात्र, त्यांनी महापालिकेचा पदभार घेतल्यावर आधारवाडी डम्पिंगची समस्या सोडवू, असे म्हटले होते. मात्र, कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. डम्पिंग ग्राउंड ते बंद करू शकले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, बोडके यांच्या आधी काम पाहणारे आयुक्त पी. वेलरासू यांची बदली आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाला लागलेल्या आगीमुळे झाली होती.

वेलरासू यांच्या कार्यकाळात महापालिका आर्थिकदृष्ट्या सबळ नव्हती. त्यामुळे त्यांनी आर्थिक बाबींचा वस्तूस्थितीदर्शक अहवाल मांडला होता. त्यांच्या पश्चात बोडके यांच्याही कारकिर्दीत विकासकामे होत नसल्याची ओरड सर्वपक्षीय सदस्यांकडून केली गेली. कररूपातून मिळणारे उत्पन्न कमी आणि विकासकामे जास्त असून, बोडके त्यातून वाट काढत होते. मात्र, आॅक्टोबरमध्ये असलेली महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांची बदली करण्यात आली आहे.

आॅक्टोबर २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी केडीएमसीला ई. रवींद्रन हे नवे आयुक्त मिळाले होते. १९९९ मध्ये श्रीकांत सिंह हे थेट आयएएस अधिकारी महापालिकेच्या आयुक्तपदी होते. त्यांच्यानंतर आयएएस अधिकारी म्हणून रवींद्रन लाभले होते. त्यानंतर वेलरासू हे देखील थेट आयएएस होते. महापालिकेचा चेहरामोहरा आयएएस अधिकारी बदलू शकतो, अशी चर्चा केली गेली. मात्र, त्यांच्याकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आता पुन्हा सूर्यवंशी हे आयएएस अधिकारी म्हणून महापालिकेस लाभले आहेत.

नव्या आयुक्तांपुढील आव्हानेच्सूर्यवंशी यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नगरसेवक त्यांची कामे मार्गी लागावीत, यासाठी त्यांना तगादा लावतील.च्महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष असून, त्यामुळे प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्या आयुक्तांची राजकीय कोंडी केली जाऊ शकते.च्आधारवाडी डम्पिंग बंद करणे, उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्प सुरू करणे, फेरीवाला प्रश्न, पार्किंगची व्यवस्था करणे, आरोग्यसेवेचा प्रश्न सोडविणे, यावर भर द्यावा लागणार आहे.च्महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उत्पन्नवाढीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर २७ गावे वगळल्यास महापालिकेची हद्द कमी होईल. त्या दृष्टीने नियोजन करणे याचा सामना नव्या आयुक्तांना करावा लागणार आहे.