शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 18:03 IST

भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी मागणी केली की धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना कल्याण जिल्ह्यात फिरू देणार नाही.

डोंबिवली: धुळे येथे विध्यार्थी हिताच्या मागण्या पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, गोर गरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली कडून निषेध करण्यात आला. या वेळी बोलताना भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी मागणी केली की धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना कल्याण जिल्ह्यात फिरू देणार नाही.

भाजयुमो पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर ह्यांनी, विद्यार्थी प्रश्नावर सरकारचे अपयश लक्षात घेता, शिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. भाजयुमो च्या मागण्यामध्ये कोरोना वैश्विक महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हालकीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हाफत्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. 

अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.

उपरोक्त मागण्यांसाठी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली परंतु असंवेदनशील पालक मंत्र्यांनी भेट नाकारली, यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतः च्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला;यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे, आशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे, कोरोना च्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे, याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयसामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा.तरी वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलने करेल याची दखल घेण्यात यावी अशी माहिती पक्षाचे जिल्हा युवध्यक्ष मिहीर देसाई, मितेश पेणकर यांनी दिली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारdombivaliडोंबिवलीthaneठाणे