शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

रेंटलची नवीन घरे एमएमआरडीएच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:54 IST

धोकादायक अथवा रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन पालिका रेंटल हाउसिंगमध्ये करत आहे. त्यानुसार, पालिकेला आतापर्यंत सुमारे ४ हजार घरांचा ताबा मिळाला आहे.

ठाणे : धोकादायक अथवा रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन पालिका रेंटल हाउसिंगमध्ये करत आहे. त्यानुसार, पालिकेला आतापर्यंत सुमारे ४ हजार घरांचा ताबा मिळाला आहे. परंतु, या योजनेतील उर्वरित घरे यापुढे पालिकेला न देता एमएमआरडीएच्या माध्यमातून त्यांचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे महापालिकेची पुनर्वसनाची वाट पालिकेची बिकट होणार आहे.तत्कालीन लोकशाही आघाडी सरकारच्या काळात वाढीव एफएसआयच्या मोबदल्यात रेंटलची घरे उभारण्याची स्किम मंजूर झाली. त्यानुसार, २००७ मध्ये एमएमआरडीएने रेंटल हाउसिंगची योजना आखली. याअंतर्गत ठाणे शहरात १२ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून ३ हजार ४०० घरे बांधकाम व्यावसायिकांनी हस्तांतरित केली आहेत. १६० चौरस फुटांची ही घरे आहेत. शहरी भागातील गरिबांना पक्की घरे विकत घेणे शक्य नसल्याने त्यांना ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार होती. मात्र, प्रत्यक्षात धोकादायक इमारतींमधील, रस्ता रुंदीकरणात बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पालिकेने या घरांमध्ये केले. योजनेच्या मूळ आराखड्यानुसार भाडेतत्त्वावर जी घरे उपलब्ध होणार होती, ती एमएमआरडीएच्या माध्यमातून वितरित केली जाणार होती. त्यावर, पालिकेचा कोणताही हक्क नव्हता. मात्र, ठाण्यातील धोकादायक इमारत कोसळल्यानंतर २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांना रेंटल हाउसिंगची घरे उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली. त्यानंतर, पालिकेने अनेक धोकादायक इमारतींमधील आणि रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांचे स्थलांतर या घरांमध्ये केले. मात्र, यापुढे पालिकेला ही घरे हस्तांतरित करायची नाही, असा सूर एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी आळवला आहे. पालिकेने ज्या पद्धतीने विस्थापितांना ही घरे दिली आहेत, त्याच धर्तीवर एमएमआरडीएच्या प्रकल्पबाधितांना ती मिळवून देण्याचा या अधिकाºयांचा मानस आहे.